शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

धक्कादायक! तिने आणलेल्या सरपणावरच नवऱ्याने रचले तिचे 'सरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 18:00 IST

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या गंगारामने मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण (चिता) रचले. या सरणावर मुक्ताबाईला ढकलत डिझेल टाकून जिवंत जाळले.

ठळक मुद्देसुशी गावात घडली थरकाप उडविणारी घटनावृद्ध पत्नीला जिवंत जाळलेचारित्र्यावर घेत होता संशय

चंद्रपूर : संशय कोणत्या थराला घेऊन जाईल, याचा विचार करवत नाही. मग, नातेही क्षुल्लक वाटायला लागते. याच संशयातून एका ७४ वर्षीय इसमाने अंगणातच सरण रचून पत्नीला जिवंत जाळले.

समाजमन सुन्न करणारी ही घटना मंगळवारी दि. ४ जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी मूल तालुक्यातील सुशी गावात घडली. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (६५) रा. सुशी असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गंगाराम सोमाजी शेंडे (७४) असे निर्दयी पतीचे नाव आहे.

मुक्ताबाई आणि गंगाराम शेंडे हे वृद्ध दाम्पत्य अख्खे आयुष्य एकमेकांशिवाय जगले नाही. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी त्या दाम्पत्यांमध्ये संशयाने जागा केली. गंगाराम याही वयात पत्नीवर संशय घेऊ लागला. अशातच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. नेहमीच क्षुल्लक कारण वादाचे कारण होत होते. गंगारामच्या मनात संशयाने पक्के घर केले होते.

मंगळवारी सकाळी मुक्ताबाई अन्न शिजविण्यासाठी लागणारे सरपण आणण्यासाठी लगतच्या जंगलात गेली. ही बाब गंगारामला खटकली. ती सरपण घेऊन दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घरी परतताच गंगारामने तिच्याशी वाद घालून भांडण केले. भांडणातून त्याने तिला बेदम मारहाण केली. डोक्यात सैतान संचारल्यागत वागत असलेल्या गंगारामने मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण (चिता) रचले. या सरणावर बळजबरीने मुक्ताबाईला टाकून तिच्या अंगावर डिझेल टाकले आणि आग लावली.

या आगीने मुक्ताबाई होरपळत होती. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी त्या दिशेने धावून आले. ती मदतीची याचना करीत होती. अखेर नागरिक तिच्या मदतीला धावून आले. लगेच उपचारार्थ चंद्रपूरला सामान्य रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास वाटेतच मुक्ताबाईची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी मूल पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून गंगाराम शेडे याला अटक केली आहे. पुढील तपास मूलचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहे.

गावकरीही होते अंतर ठेवून 

गंगाराम शेंडे हा स्वभावाने अतिशय तापट होता. गावातील नागरिकांशीही त्याचे पटत नव्हते. अनेकजण त्याच्याशी अंतर ठेवूनच वागत होते. या दोघांमध्ये वाद व्हायचा. अखेर गंगारामने तापट स्वभावातून पत्नीलाच जिवंत जाळल्याची घटना घडली असल्याची चर्चा गावात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारfireआगDeathमृत्यू