शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

चंद्रपूर व गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील शेकडो गावे प्रकाशणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:24 AM

चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली.

ठळक मुद्देचंद्रपूर परिमंडळात उभारणार १ हजार १४६ नवीन वीज रोहित्र

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वनव्याप्त दुर्गम, आदिवासी भागात वीज पुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात १ हजार १४६ नवीन वितरण रोहित्र उभारण्याचे काम सुरू झाल्याने अनेक वर्षांची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात २०१४ मध्ये २ हजार ७८४ तर २०१४-१७ या वर्षात १ हजार ८२३ नवीन वितरण रोहित्र उभारण्यात आले. मात्र, नक्षलग्रस्त व जंगली भागातील शेकडो गावांना वीज पुरवठा करणे कठीण झाले होते. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार वीज खांब उभारण्यासोबतच वितरण रोहित्रांची आवश्यकता पूर्ण करताना समस्येला तोंड देण्याची वेळ वीज वितरण कंपनीवर आली. दरम्यान, महावितरणने पायाभूत विकास आराखड्याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३६७ रोहित्र उभारण्याचा निर्णय घेतला. यातील ५० टक्के कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामे सुरू आहेत. याशिवाय, २६ वितरण रोहित्रची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. उच्चदाब तसेच लघुदाब वाहिनी, ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र व अतिरिक्त रोहित्रची गरज लक्षात सुमारे ८२ कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेकडो गावे प्रकाशमान होण्याची आशा निर्माण झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही ७७९ रोहित्रची कामे सुरू असून १४० वितरण रोहित्रच्या क्षमतेत वाढ केली जात आहे.४० हजार नागरिकांपर्यंत पोहोचणार ग्रामज्योतीदिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत चंद्रपूर १३ हजार ६३२ आणि गडचिरोली जिल्ह्यात २६ हजार २३८ असे एकून ३९ हजार ८६० दारिद्रय रेषेखालील नागरिकांना नवीन वीज जोडणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आदिवासी शेतकऱ्यांचा कृषिपंपाकडे कलगडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत १७ हजार १४८ कृषिपंप सुरू आहेत. कृषि संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचीही संख्या लक्षवेधी असून मागील महिन्यात वीज बिलातील त्रुटी दूर करण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तक्रारी दूर झाल्याने १ हजार ७३२ आदिवासी शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी अर्ज केले. मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी मंजुरी प्रदान केल्याने ही कामेही लवकरच सुरू होणार आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण