शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

मालधक्क्यावर शेकडो टन खत भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:50 AM

खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही.

ठळक मुद्देचंद्रपुुरातील प्रकार : ट्रकच्या रांगा, सावरण्याआधीच मुसळधार पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही. परिणामी शेकडो टन खत पावसाच्या पाण्याने भिजल्याचा प्रकार रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूरच्या मालधक्क्यावर घडला.रविवारी सकाळपासूनच वातावरण कोरडे असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे मालगाडीने आलेला खत जमिनीवर उतवून ठेवण्यात आला. काही वाहतूकदारांनी खत ट्रकांमध्ये लोड केले. मात्र दुपारी १ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उघड्यावर असलेल्या शेकडो टन खतावर झाकणे शक्य झाले नाही. परिणामी शेकडो टन खत पाण्याने भिजला.‘लोकमत’ने दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली असता, खत असलेल्या जागेवर पाणी साचल्याने आढळून आले. काही ढिगांवर झाकण्यात आले होते. तर माल लोड करण्यासाठी ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या.मालधक्यावर उतरलेला माल साठवून ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती खत वाहतूक करणाºया ट्रकचालकांनी दिली.मालधक्क्यावर असुविधाचंद्रपूर येथील मालधक्क्यावर नेहमीच खत, धान्य व इतर वस्तू उतरविल्या जातात. मात्र उतरवलेला माल साठवणूक करण्यासाठी शेड नसल्याने लगेच मालाची उचल करावी लागते. याच मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगनने आलेला माल गडचिरोली जिल्ह्यातही पोहचविला जाते. त्यामुळे येथे माल साठवणुकीसाठी शेडची नितांत गरज आहे. मात्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने दरवर्षीच येथे उतरविलेला माल पावसाच्या पाण्यात भिजत असते. या मालधक्यावर कच्चा रस्ता असल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. परिणामी ट्रक चालकांनाही मोठी कसरत करावी लागते.खत विरघळणारशेतपिकांना युरिया खत अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाची लागवड करणारा शेतकरी युरिया खताची मागणी करतो. युरिया खत पाणी लागल्यास सर्वात कमी वेळात विरघळणारा खत आहे. पावसाने भिजलेला खत आता शेतकºयांच्या माथी मारला जाणार असून ५० किलोची बॅग आता कमी वजनाची भरणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. मात्र खताची गरज व पाण्याने खत भिजल्याची माहिती शेतकºयांना नसल्याने कृषी केंद्रात पुरवठा केला जाणार कमी वजनाचा हा खत बिनदिक्कत विकला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी