शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

तालुक्यातील शेकडो बंधारे पाण्याविना कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:15 IST

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देयावर्षी पाणीप्रश्न पेटणार : उन्हाळा सुरू होताच जलसंकटाची स्थिती

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाणी टंचाईची समस्या उग्ररूप धारण करायला लागली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने गावशिवारात शासनाने वनराई बंधारे, शेततळे, तलाव बांधले. पाणी अडवा, पाणी जिरवा ही शासनाची संकल्पना सर्वांची भले करणारी असली तरी अनेक बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट असल्याने पावसाचे पाणी बंधाऱ्यात अडवून त्याची परिसरातील नागरिकांना लाभ घेता आला नाही. शासनाने बंधाºयावर लाखो रूपयाचा खर्च करूनदेखील शासनाला बंधाºयात पाण्याचा थेंबदेखील अडविता आला नाही. यंदा उन्हाळा सुरू होताच तापमानाच्या भडका उडायला सुरूवात झाली आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे पूर्णत: आटायला लागल्याने यावर्षी पाणी टंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, माथरा, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, कळमना, निंबाळा हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने या गावपरिसरात जलसंकट घोंगावत आहे. या परिसरात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी असल्याने या कोळसा खाणीत पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. परिणामी या परिसरातील जलस्तर कमालीचा घटल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे.वेकोलि परिसरातील गावांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. परंतु प्रशासनाने यावर आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही. हे नागरिकांचे दुर्दैव आहे. शासनाने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने बंधारे बांधले. परंतु शासनाने बंधाऱ्यावर लाखो रूपयांचा खर्च करूनही प्रशासनाला बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. राजुरा तालुक्यातील शेकडो बंधारे कोरडे पडल्याने यंदा नागरिकांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार आहे.यंदा पाणी प्रश्न पेटणारउन्हाळा सुरू होताच नदी, नाले, तलाव, बंधारे पूर्णत: कोरडे पडायला लागले आहे. मार्च महिन्यातच पाणी टचांई जाणवू लागली आहे. जनावरांना प्यायला पाणी मिळत नसल्याने त्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.