शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील शेकडो बंधारे पाण्याविना कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:15 IST

यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देयावर्षी पाणीप्रश्न पेटणार : उन्हाळा सुरू होताच जलसंकटाची स्थिती

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाणी टंचाईची समस्या उग्ररूप धारण करायला लागली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने गावशिवारात शासनाने वनराई बंधारे, शेततळे, तलाव बांधले. पाणी अडवा, पाणी जिरवा ही शासनाची संकल्पना सर्वांची भले करणारी असली तरी अनेक बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट असल्याने पावसाचे पाणी बंधाऱ्यात अडवून त्याची परिसरातील नागरिकांना लाभ घेता आला नाही. शासनाने बंधाºयावर लाखो रूपयाचा खर्च करूनदेखील शासनाला बंधाºयात पाण्याचा थेंबदेखील अडविता आला नाही. यंदा उन्हाळा सुरू होताच तापमानाच्या भडका उडायला सुरूवात झाली आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे पूर्णत: आटायला लागल्याने यावर्षी पाणी टंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, माथरा, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, कळमना, निंबाळा हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने या गावपरिसरात जलसंकट घोंगावत आहे. या परिसरात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी असल्याने या कोळसा खाणीत पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. परिणामी या परिसरातील जलस्तर कमालीचा घटल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे.वेकोलि परिसरातील गावांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. परंतु प्रशासनाने यावर आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही. हे नागरिकांचे दुर्दैव आहे. शासनाने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने बंधारे बांधले. परंतु शासनाने बंधाऱ्यावर लाखो रूपयांचा खर्च करूनही प्रशासनाला बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. राजुरा तालुक्यातील शेकडो बंधारे कोरडे पडल्याने यंदा नागरिकांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार आहे.यंदा पाणी प्रश्न पेटणारउन्हाळा सुरू होताच नदी, नाले, तलाव, बंधारे पूर्णत: कोरडे पडायला लागले आहे. मार्च महिन्यातच पाणी टचांई जाणवू लागली आहे. जनावरांना प्यायला पाणी मिळत नसल्याने त्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.