शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आताच पाण्याविना पडले कोरडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:16 IST

यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता : जनावरांची पाण्यासाठी भटकंती

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा भडका उडाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. सद्यःस्थितीत राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो बंधाऱ्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नदी पट्टयातील बहुतांश गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, धोपटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या उग्र होत चालली आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बारमाही वाहणाऱ्या नदी, नाल्यात अत्यल्प जलसाठा होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने अंग शेकून निघत आहे. पुढील मे महिन्यात उन्हाच्या प्रखर झळा नागरिकांना बसणार असून, त्यासोबतच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही वेकोली परिसरातील नाले, तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून कधी कोरडे न पडणारे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. ३०० ते ४०० फूट खोल वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणी राजुरा तालुक्यात आहेत. या कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी खालावत चालली आहे.

कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी घटलीराजुरा तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्याचा फटका वेकोली परिसरातील गावांना बसला आहे. नदी, नाल्याचे पात्र कोरडे पडत चालल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. 

वर्धा नदीत अत्यल्प जलसाठाराजुरा तालुक्यातून वाहणाऱ्या आणि नदी पट्टयातील गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने वर्धा नदीचे अर्धे अधिक पात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका परिसरातील गावांना बसणार आहे.

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर