शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आताच पाण्याविना पडले कोरडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:16 IST

यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता : जनावरांची पाण्यासाठी भटकंती

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा भडका उडाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. सद्यःस्थितीत राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो बंधाऱ्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नदी पट्टयातील बहुतांश गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, धोपटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या उग्र होत चालली आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बारमाही वाहणाऱ्या नदी, नाल्यात अत्यल्प जलसाठा होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने अंग शेकून निघत आहे. पुढील मे महिन्यात उन्हाच्या प्रखर झळा नागरिकांना बसणार असून, त्यासोबतच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही वेकोली परिसरातील नाले, तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून कधी कोरडे न पडणारे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. ३०० ते ४०० फूट खोल वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणी राजुरा तालुक्यात आहेत. या कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी खालावत चालली आहे.

कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी घटलीराजुरा तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्याचा फटका वेकोली परिसरातील गावांना बसला आहे. नदी, नाल्याचे पात्र कोरडे पडत चालल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. 

वर्धा नदीत अत्यल्प जलसाठाराजुरा तालुक्यातून वाहणाऱ्या आणि नदी पट्टयातील गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने वर्धा नदीचे अर्धे अधिक पात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका परिसरातील गावांना बसणार आहे.

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर