शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ग्रामीण भागातील शेकडो बंधारे आताच पाण्याविना पडले कोरडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:16 IST

यंदा पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता : जनावरांची पाण्यासाठी भटकंती

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा भडका उडाला. त्यामुळे नदी, नाले, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. सद्यःस्थितीत राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो बंधाऱ्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नदी पट्टयातील बहुतांश गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, धोपटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या उग्र होत चालली आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बारमाही वाहणाऱ्या नदी, नाल्यात अत्यल्प जलसाठा होता. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने अंग शेकून निघत आहे. पुढील मे महिन्यात उन्हाच्या प्रखर झळा नागरिकांना बसणार असून, त्यासोबतच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही वेकोली परिसरातील नाले, तलाव, बंधारे कोरडे पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून कधी कोरडे न पडणारे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. ३०० ते ४०० फूट खोल वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणी राजुरा तालुक्यात आहेत. या कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी खालावत चालली आहे.

कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी घटलीराजुरा तालुक्यात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्याचा फटका वेकोली परिसरातील गावांना बसला आहे. नदी, नाल्याचे पात्र कोरडे पडत चालल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. 

वर्धा नदीत अत्यल्प जलसाठाराजुरा तालुक्यातून वाहणाऱ्या आणि नदी पट्टयातील गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने वर्धा नदीचे अर्धे अधिक पात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका परिसरातील गावांना बसणार आहे.

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर