शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेकडो एकरातील उगविलेले अंकुर कोमेजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:55 IST

मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. पावसाने उघाड दिल्याने मातीत उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर आले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये चिंता : पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. पावसाने उघाड दिल्याने मातीत उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर आले आहेत.सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. पण बहुतांश शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून पेरणीची तयारी केली. आठ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. येत्या चार दिवसात पावसाचे आगमन झाले नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. विहिर असलेल्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. पण सुविधा नसलेले शेतकरी चिंतेत दिसत आहे. मोहाळी व गुंजेवाही क्षेत्रात आठ दिवसांपासून पाऊस आला नाही. सिंचन सुविधा नसल्याने रोपे वाचविण्यासाठी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. या परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होते. यावर्षीदेखील हाच प्रकार सुरू आहे. किन्ही व मुरमाडी परिसरात वाघाच्या भितीमुळे रोपांची निगराणी ठेवू शकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होते. पेरणी झाल्यापासून काही शेतकरी शेतावर चजात नाही आहे. मागील वर्र्षाच्या तुलनेत यंदा धान लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे.पाऊसच नाही तर कशी करायची?आयुधनिर्माणी (भद्रावती) : मृग नक्षत्र लागल्यानंतर सुरूवातीचे दोन दिवस बऱ्यापैकी हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारलीे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले. अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस केव्हा पडतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जूनपासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्याने यंदा पाऊस समाधानकारक पडेल, असे भाकीत करून सगळ्यांना खुश करून टाकले होते. मात्र त्यांचे भाकीत चुकल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने आनंद पसरला होता. मात्र आठवडा उलटूनही पाऊस न पडल्याने वातावरण पुन्हा तापू लागले आहे. उन्हामुळे जीव कासावीस होत आहे. नागरिकांना घराबाहेर जाताना विचार करावा लागत आहे. पाऊस आला तर यंदा शेती कशी करायची, हा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.कर्जाचा भार वाढण्याचा धोकागेवरा : परिसरात धानाची शेती केली जाते. पण, पाऊस नसल्याने यंदा कर्जाचा भार वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. जून महिन्यात बºयापैकी पडणारा पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे सर्व नियोजन कोलमडले आहे. अनेक शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली. पण पाऊस आला नाही तर उत्पादन कसे होणार या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. खरीप पिके वाया गेल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकटांची कुऱ्हाड कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागावर रोषपोंभुर्णा : शेतकऱ्यांनी बियाणे व खताची खरेदी केली. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची वाट पाहत आहे. पण पाऊस नसल्याने खरीप हंगाम शुन्य नजरेने शेतकरी शेताकडे पाहत आहे. हवामान खात्याच्या खोट्या अंदाजाला बळी पडून पेरणीची घाई करणारा शेतकरी आता रोष व्यक्त करीत आहे. यंदा खरीप हंगामात चांगले पीक येईल या आशेवर रखरखत्या जमिनीची मशगत केली. जगण्याच्या उमेदीने शेतकऱ्यांनी पेरणी केली. हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवला. पण पाऊस न आल्याने शेतकºयाचे सर्व नियोजन वाया गेले आहे. पावसाअभावी उष्णता वाढली. पेरलेले बियाणे करपत आहे. उधार -उसणे करून बियाणे विकत घेतले. पावसाअभावी दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला. तालुक्यात भाताची शेती अधिक प्रमाणात केली जाते. काही शेतकरी भाजीपाला लावतात. यावर यांचा उदरनिर्वाह चालतो. पण, पावसाच्या चिंतेने शेतकरी हतबल झाला. कृषी विभागाने या तालुक्यात योग्य मार्गदर्शन केले नाही. पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या करू नका, अशी माहिती गावागावांत पोहोचविण्यात आली नाही. त्यामुळे हंगाम टळेल या हेतूने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने दगा दिल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. कृषी विभागाने आता तरी मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.