शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

४३६ रुपयांत किती जणांना मिळाला दोन लाखांचा विमा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:00 IST

वारसाच्या खात्यात थेट मिळतो लाभ : दरवर्षी करावे लागते नूतनीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. जीवन ज्योती ४३६ तर सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. मृताच्या वारसाला दोन लाखांचा लाभ थेट त्याच्या बँक खात्यात जमा केला आतो. कुटुंबातील सदस्याने काढलेल्या विम्याचा लाभ वारसांना मिळाला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. विमा काढल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. विमा कव्हरच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला लाभ दिला जातो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले जात आहे.

काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपयांत काढला जातो. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी वारसाला दोन लाख रुपयांचा लाभ होतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. विमाधारकाचा सर्पदंशाने अथवा अपघाती मृत्यू आल्यास शवविच्छेदन अहवाल, पोलिस दप्तरी नोंद आवश्यक आहे.

विमा योजनेचा लाभ घ्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन्ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या आहेत. या योजनेतून थेट मृताच्या लाभार्थ्यांच्या वारसाला लाभ मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेद्वारे विमा उतरून संरक्षण कवच घ्यावे, असे आवाहन अग्रणी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

'जीवन ज्योती'चे खातेदार लाखांवरजिल्ह्यात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काढणाऱ्या खातेदारांची संख्या लाखांवर आहे. त्यासाठी ४३६ रुपये भरावे लागतात.अद्यापही अनेकजण विम्याचा लाभ घेण्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात.

'सुरक्षा विमा'चे तीन लाख खातेदारप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे जिल्ह्यात तब्बल तीन लाखांवर खातेदार आहेत. केवळ २० रुपयांत विमा निघत असल्याने नागरिक हा विमा काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.  

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर