शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४३६ रुपयांत किती जणांना मिळाला दोन लाखांचा विमा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:00 IST

वारसाच्या खात्यात थेट मिळतो लाभ : दरवर्षी करावे लागते नूतनीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. जीवन ज्योती ४३६ तर सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. मृताच्या वारसाला दोन लाखांचा लाभ थेट त्याच्या बँक खात्यात जमा केला आतो. कुटुंबातील सदस्याने काढलेल्या विम्याचा लाभ वारसांना मिळाला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. विमा काढल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. विमा कव्हरच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला लाभ दिला जातो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले जात आहे.

काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपयांत काढला जातो. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी वारसाला दोन लाख रुपयांचा लाभ होतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा केवळ २० रुपयांत काढला जातो. विमाधारकाचा सर्पदंशाने अथवा अपघाती मृत्यू आल्यास शवविच्छेदन अहवाल, पोलिस दप्तरी नोंद आवश्यक आहे.

विमा योजनेचा लाभ घ्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन्ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या आहेत. या योजनेतून थेट मृताच्या लाभार्थ्यांच्या वारसाला लाभ मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेद्वारे विमा उतरून संरक्षण कवच घ्यावे, असे आवाहन अग्रणी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

'जीवन ज्योती'चे खातेदार लाखांवरजिल्ह्यात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काढणाऱ्या खातेदारांची संख्या लाखांवर आहे. त्यासाठी ४३६ रुपये भरावे लागतात.अद्यापही अनेकजण विम्याचा लाभ घेण्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात.

'सुरक्षा विमा'चे तीन लाख खातेदारप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे जिल्ह्यात तब्बल तीन लाखांवर खातेदार आहेत. केवळ २० रुपयांत विमा निघत असल्याने नागरिक हा विमा काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.  

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर