शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीत भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत मजुराचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:13 IST

जखमींना एक तास रुग्णवाहिकेची वाट : गोंडपिंपरीत आरोग्य व्यवस्था उघडी पडली

गोंडपिंपरी : शहरातील हिती कॉटन जिनिंगसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना चिरडून दुचाकीला धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना सोमवारी (दि. ४) दुपारी २ वाजता घडली. अजय सुबोधसिंग मंडल (वय ३२, रा. लक्ष्मीपूर बिहार) असे मृतकाचे नाव आहे. गंभीर जखमी मनोजकुमार दिनेश मंडल (३५, रा. भवानीपूर), केदार तिथर मंडल (३५, रा. सुपली, बिहार) व साईनाथ दाऊजी कोहपरे (३५, रा. वढोली) यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर पळून जाणाऱ्या चालकाला संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

तेलंगणा राज्यातून सीजीओ ७ ए डब्लू ७८३९ क्रमांकाचा भरधाव ट्रक रायपूर (भिलाई) कडे निघाला होता. गोंडपिंपरी शहरात प्रवेश केल्यानंतरही चालकाने वेग कमी केला नाही. हिती कॉटन जिनिंगसमोर धान्य व्यापारी हनुमंतु झाडे यांचे गोदाम आहे. या गोदामाकडे जाण्यासाठी चार मजूर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याच ठिकाणी साईनाथ कोहपरे हा दुचाकीधारक मजुरांसोबत बोलत होत असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन चौघांना चिरडले. यामध्ये अजय मंडल याचा जागीच मृत्यू झाला. मनोजकुमार मंडल, केदार मंडल व साईनाथ कोहपरे हे तिघे गंभीर जखमी झाले. ट्रकच्या अॅगलला एक मजूर अडकून असतानाही चालकाने पुन्हा वेग वाढवून आष्टी मार्गे वाहन दामटले. नागरिकांनी हे थरार दृश्य पाहताच मोठ्या हिमतीने ट्रकला अडविला व हवा सोडली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल होताच चालकाला त्यांच्याकडे स्वाधीन केले. घटनास्थळावर मोठी गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे पथकाने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. ट्रकचालक संतोषकुमार भिरेंद्र राम (३६, रा. कारो उत्तर प्रदेश) याला अटक केली. पुढील तपास गोंडपिंपरी पोलिस करत आहेत. 

रुग्णवाहिका परत मागितलीयापूर्वी सुरजागडच्या वाहनांमुळे अपघात झाले. त्यामुळे सुरजागड येथील कंपनीने नागरिकांसाठी एक स्वतंत्र रुग्णवाहिका गोंडपिंपरी पोलिस ठाण्याला दिली होती. मात्र, ती परत मागून कोठारी पोलिस ठाण्याला दिली. वारंवार अपघात होत असताना गोंडपिंपरी ठाण्यात रुग्णवाहिका का नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

जखमींची एक तास ताटकळगोंडपिंपरी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय अंतर्गत केवळ चार रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी तीन रुग्णवाहिका या गरोदर मातांसाठी राखीव असतात. एक रुग्णवाहिका १०८ ही कुठेही पाठवली जाते. भीषण अपघातात तिघे जखमी झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविणे गरजेचे असताना रुग्णवाहिकेअभावी एक तास ग्रामीण रुग्णालयातच ताटकळत राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूर