शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
3
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
4
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
5
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
6
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
7
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
8
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
9
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
10
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
11
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
12
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
13
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
14
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
15
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
16
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
17
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
18
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
19
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
20
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या महत्त्वात आता शिवजयंतीची भर !

By admin | Updated: February 25, 2016 00:54 IST

बल्लारपूरची ओळख आज औद्योगिक शहर अशी झाली आहे. सोबतच, या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

महत्त्व आणखी वाढले : स्वातंत्र्य व गणराज्य दिनाला होते ध्वजारोहणवसंत खेडेकर - बल्लारपूरबल्लारपूरची ओळख आज औद्योगिक शहर अशी झाली आहे. सोबतच, या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या भागात सुमारे ६०० वर्षे गोंडवंशीय राजांची सत्ता राहिली आहे. त्याकाळी बल्लारपूर (बल्लारशहा) अर्थात येथील वर्धा नदी काठावरील ऐतिहासिक किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्व होते. आजही या किल्ल्याचे महत्त्व असून या ठिकाणी गणराज्य दिन, स्वातंत्र दिन, महाराष्ट्र दिन साजरा होतो. आता या ठिकाणी शिवजयंतीही साजरी करण्यास सुरूवात झाली आहे.आदिया बल्लारसिंह या शासकाने हा किल्ला बांधून या भागाला बल्लारशहा असे नाव दिले. या ठिकाणी आदिया बल्लाळसिंह ते खांडक्या बल्लारशाह (कार्यकाळ १३२२ ते १४९७) असे सात राजे होऊ गेलेत. येथील शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाह याला आताच्या चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिराच्या जागेवर चमत्कारिक अनुभव आला आणि त्याने चंद्रपूरला परकोट बांधून बल्लारशहा येथील राजधानी चंद्रपूरला हलविण्याचे ठरविले.त्याने परकोटाची पायाभरणी केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हिरशहा याने त्यावर परकोट बांधून चंद्रपूरला विकसित केले. यानंतर चंद्रपूरला महत्व आले ते कायमचे! बल्लारपूरच्या किल्ल्याचे गोंडकालीन साम्राज्यात असे महत्व होते. गोंड, भोसले ही राजेशाही गेली. नंतर इंग्रजांनी येऊन येथे आपली सत्ता गाजविली. हा किल्ला त्या घटनांचा साक्षीदार आहे. काळपरत्वे हा किल्ला काही ठिकाणी ढासळला असला तरी या किल्ल्याचे दोन मोठे प्रवेशद्वार, उत्तरेकडील लहान दरवाजा, नदीकडील तट आणि प्रवेशद्वार तसेच, नदी काठावरील हवेली राणी महल हे आजही मजबूत आणि चांगल्या स्थितीत आहेत. या किल्ल्याचे एकंदरीत ऐतिहासिक महत्व बघून या राष्ट्रीय वास्तू वैभवाचा सन्मान म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने अर्थात बल्लारपूर नगर परिषदेने (न.प. पूर्वी नोटेफाईड एरिया) १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी गणतंत्र दिन, या राष्ट्रीय दिनी ध्वजारोहण करण्याची प्रथा सुरू केली. नगरपालिकेचे उपाध्यक्ष या ठिकाणी ध्वजारोहण करतात. याप्रसंगी लोकांची मोठी उपस्थिती असते. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य बनले. महाराष्ट्र दिनाप्रित्यर्थ किल्ल्यावर न.प. कडून उपाध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहण करणे सुरू झाले. वर्षातून असे तिनदा ध्वजारोहण होत असते. शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते. बल्लारपूर शहरात त्याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. साईबाबा मंदिरापासून ती काढली जात असे. गतवर्षीपासून स्थळात बदल करून ती आता ऐतिहासिक किल्ल्यापासून काढली जाऊ लागली आहे. शिवबाच्या अनुयायींनी येथील ऐतिहासिक किल्ल्याची शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी घेतलेली ही दखल निश्चितच सुखावणारी आहे. आणि ऐतिहासिक किल्ल्यापासून मिरवणूक काढणे संयुक्तिकही ठरते. यंदा तर या मिरवणुकीचा बाज बघण्यासारखा होता. मराठमोळ्या पेहरावात महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. किल्ल्याचे मोठे प्रवेशद्वार गर्दीने फुलले होते.