शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

वीरशहाचे स्मृतीस्थळ हिराई-वीरशहाच्या प्रेमाचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM

बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली.

ठळक मुद्देव्हॅलेंटाईन डे स्पेशल : तरुण-तरुणींनी घ्यावा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : आज जागतिक प्रेम दिन! एकमेकांना प्रेमाच्या शुभेच्छा देण्याचा दिवस. प्रेम प्रतिक असणाऱ्या स्थळांना भेट देऊन, त्यांच्या प्रेमाची आठवण करण्याचा दिवस! चंद्रपूर येथील राजा वीरशहा यांचे स्मृति स्थळ हे राजा व त्याची राणी हिराई यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून महाविद्यालयीन तरूण व तरूणी या दिवशी तेथे जाऊन राजा तसेच राणी या दोघांच्या समाधींना गुलाबपुष्प वाहतात. या स्मृतीस्थळाला भेट देत असताना त्यांनी राजा व राणी यांच्या कर्तबगारीचीही माहिती ठेवावी! या ऐतिहासिक शासकांनी दीर्घकाळ स्मरणात राहावे असे कार्य केले आहे.बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने विधवा हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेउन त्याला गादीवर बसविले व ती राज्य कारभार बघू लागली. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला संस्कारित केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. त्यांना तिने धाडसाने उत्तर दिले. राणी स्वत: रणांगणावर उतरली. प्रजेचे हित जोपासत उत्कृष्ट बांधकाम, शिक्षण याकडे लक्ष देउन राज्याचा सर्वांगीण विकास केला. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. तरीही राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर तसेच महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न तिने खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा आणि हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविलीच.आदर्श पती व पत्नी म्हणूनही त्यांनी आपले सांसारिक जीवन फुलविले. या कर्तबगार राजा व राणीच्या प्रेम प्रतिकांना भेट देताना, आपण चांगले कर्तव्यनिष्ट नागरिक व चांगले आदर्श पती व पत्नी बनू हा संकल्प तरूण - तरूणींनी करावा. आज देशाला त्याचीच नितांत गरज आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे