शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी जवळ; पण खाणाखुणा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:31 AM

उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.

ठळक मुद्दे‘एनएच ३५३’ ची कमाल; नव्या रस्त्याने सौदर्यांत भर

घनश्याम नवघडे ।नागभीड : उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.नागभीड आणि ब्रह्मपुरी ही दोन शहरे तशी एकमेकांना नवीन नाहीत. पूर्वी ही दोन्ही शहरे एकाच तालुक्याचे अविभाज्य घटक होते. नंतर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने १ मे १९८१ रोजी स्वतंत्र नागभीड तालुक्याची निर्मिती करण्यात आली. नागभीड स्वतंत्र तालुका झाल्यानंतरही विविध खरेदी, वैद्यकीय सोय आणि शैक्षणिक व अन्य कामांच्या निमित्ताने आजही नागभीडकरांचे ब्रह्मपुरीशी नाते जुळून आहे.या नात्याला वृद्धींगत करण्यासाठी दळणवळणाची साधनेही महत्त्वाची असतात. ती साधने आधीपासूनच उपलब्ध होती. नागभीड-ब्रह्मपुरी हा रेल्वेमार्ग तर इंग्रजकालीन आहे. आणि नागभीड-ब्रह्मपुरी राज्य मार्गही पुरातनच आहे. आता याच राज्यमार्गाचे ‘नॅशनल हायवे’मध्ये रूपांतर झाले असून कामही झपाट्याने सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.या नॅशनल हायवेवर नागभीड-ब्रह्मपुरी दरम्यान अनेक गावे आहेत. सुलेझरी, भिकेश्वर, नवेगाव पांडव फाटा, कोर्धा, पांजरेपार, किरमिटी फाटा, मेंढा, अड्याळ फाटा, सायगाटा मंदिर फाटा, खरबी आदी अनेक गावांचा यात उल्लेख करता येईल. पूर्वी राज्यमार्ग होता तेव्हा या मार्गाने बसमधून प्रवास करताना अपेक्षित गावाजवळ येत असल्याच्या अनेक खाणाखुणा डोक्यात तरळून जायच्या. ती ओळखीची झाडे, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत तटस्थपणे उभे असलेले एखाद्या गावातील मोडकेतोडके छोटेसे बसस्थानक हे सारे आता नामशेष झाले आहेत. ब्रह्मपुरीला उतरायचे आहे म्हटल्यावर खरबीच्या टेकरापासूनच बसमधून प्रवास करणारे प्रवासी उतरण्याची लगबग सुरू करायचे. पण आता या राज्यमार्गाचे नॅशनल हायवेमध्ये रूपांतर झाल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण झाले आहे.या रूंदीकरणात रस्त्याच्या आजूबाजूला असलेले वृक्ष, ओळखीच्या खाणाखुणा नामशेष झाल्याने या रस्त्यावरील गाव केव्हा येते हे कळतच नाही. बसचा वाहक घंटी वाजवून गाव आल्याचे सांगतो, तेव्हा ते गाव आल्याचे लक्षात येते. तद्वतच दुचाकीने किंवा चारचाकीने ब्रह्मपुरीला जाणाऱ्या किंवा ब्रम्हपुरीकडून नागभीडकडे प्रवास करणाऱ्यांना प्रवाश्यांना हाच अनुभव येत आहे.या महामार्गावर असलेल्या कोर्धा आणि मेंढा या गावातून दुभाजक काढण्यात आल्याने या गावांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या दुभाजकांमुळे गावेही प्रशस्त वाटत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गावर असलेल्या खुणा नव्या हायवेमुळे नामशेष झाल्या आहेत.हा नँशनल हायवे झाल्याने नागभीड -ब्रम्हपुरी प्रवासाला एक प्रकारचा हुरूपही आला आहे. एरव्ही ब्रह्मपुरीला जाऊन अमूक काम करून ये म्हटल्यावर आढेवेढे घेणारे ब्रह्मपुरीस जायला सहज तयार होताना दिसत आहेत. कारण रस्ताच एवढा प्रशस्त होत आहे की, गाडी सुरू केल्यानंतर ब्रह्मपुरी केव्हा आले याचा पत्ताच प्रवाशांना लागत नाही.

टॅग्स :highwayमहामार्ग