शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

अतिपावसाचा कडधान्य पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 6:00 AM

जिल्ह्यात सावली, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून रोवणी तसेच कडधान्य पिकांची पेरणी केली.

ठळक मुद्देउत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी आर्थिक संकटाततुर, तीळ, पोपटसह इतर पिकांचे नुकसानशेतात पाणी असल्याने पीक कुजलेधान, सोयाबीन, कापूसही धोक्यातकर्ज काढून केली पिकांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर एक-दोन दिवसाआड संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. आताही पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून तुरीची झाडे कुजत आहेत. त्यामुळे तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका तूर, तीळ, पोपट, वाल, कापूस, सोयाबीन या पिकांनाही बसत आहे.जिल्ह्यात सावली, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने धानपिकांची शेती केली जाते. यावर्षी धानपिकाचे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून रोवणी तसेच कडधान्य पिकांची पेरणी केली. जिल्ह्यातील कोरपना, वरोरा, राजुरा, भद्रावती या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकात तुरीचे आंतरपीक घेतले आहे. अलीकडे आंतरपिकासह अनेक शेतकरी संपूर्ण शेतात तुरीचे पीक घ्यायला लागले आहे, तर काही शेतकरी संपूर्ण शेतात सोयाबीनची पेरणी करतात. यावर्षी जिल्ह्यात तूर व सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र संततधार पावसामुळे हे पीक आता धोक्यात आले आहे.पावसाळ्याच्या सुरुवातील पावसाने उसंत घेतल्याने शेतकºयांची काळजी वाढली होती. त्यानंतर संततधार पावसामुळे कडधान्य पिकाची नासाडी होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काठालगतच्या शेतजमिनीतील सोयाबीन, तुरी व इतर कडधान्याचे पीक नष्ट होत आहेत. २५ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सतत पाऊस येत असल्याने शेताच्या सखल भागातील तुरी पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. तर काही शेतातील पीक मुसळधार पावसामुळे वाकले असून त्यांचीही स्थिती बिकट आहे.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात तुरीचे पीक शेवग्यावर येते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत आहे.ज्या शेतकºयांनी तुरीचा पीक विमा काढला, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. सोयाबीन, कापूस पिकाचीही स्थिती अतिपावसामुळे चिंताजनकच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.बजेट कोलमडणारधानपिकासोबत विविध प्रकारच्या कडधान्याचे उत्पादन घेवून शेतकरी प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोन्ही प्रकारचे पिके घेतले तर त्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे धान या मुख्य पिकासह तूर, तीळ, पोपट, वाल हे कडधान्य तसेच सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांचे आर्थिक बजेट यावर्षी कोलमडणार असून आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.सोयाबीनवर किडीचे आक्रमणयावर्षी सोयाबीन पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. सुरुवातीला बियाणे उगवले नाही. आता सोयाबीनला विविध किडींनी ग्रासले आहे. त्यामुळे पीक पिवळे पडले असून शेकडो हेक्टरवरील सोयाबीनवर खोड किडींचा प्रादूर्भाव झाला आहे.यंदा पर्जन्यमानात बदल झाल्याने सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटले. त्यातच सोयाबीनवर काही प्रमाणात खोड कीड व उंट अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने आता शेतकरी चिंतेत आहे.दरवर्षी शेतकºयांना या ना त्या कारणामुळे नुकसानीला सामोरे जावे लागते. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पाचविला पुजलेलाच आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यावर्षी संततधार पावसामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, कापूस पिकांमध्ये गवताची वाढ झाली आहे. शेतातील सखल भागातील तूर तसेच इतर पीक पूर्णत: सडले आहे.- प्रभाकर जुनघरी, शेतकरी, गोवरीकवडजई शिवारातील धान पीक पडले पांढरेयेनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील कवडजई शिवारात ९० टक्के धान रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाने अनुकूल प्रतिसाद दिल्याने धान पीक डौलात होते. मात्र अतिपावसामुळे अनेकांच्या धान पिकावर पांढºया रोगाचे आक्रमण झाले आहे. हा रोग सर्वसाधारणपणे लवकर आटोक्यात येतो. परंतु बांदीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. हा रोग वाढू नये यासाठी शेतकºयांनी कृषी सल्ला घेवून योग्य वेळी उपाययोजना करावी. अन्यथा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती