शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंताच्या भारतरत्न पुरस्कारासाठी गुरुजीचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST

चिमूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ २६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाच्या ऒचित्यावर ...

चिमूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ २६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाच्या ऒचित्यावर प्रदान करावा, अशी मागणी राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचारकृती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मोहितकर गुरुजी यांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून ते यासाठी लढा देत आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान मिळावा, अशी मागणी सर्वप्रथम २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान यांना लेखी निवेदन पाठवून केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली १७ वर्षे सातत्याने या मागणीच्या अनुषंगाने ते पञव्यवहार व पाठपुरावा करीत आहेत. विदर्भ व महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांना तसेच महाराष्ट्र व भारत सरकारला हजारो निवेदने पाठविली. साहित्य संमेलनाचे ठराव, सामाजिक संस्था, संघटनांनी केलेल्या मागण्यांबाबत शासनाला अवगत केले. या मागणीच्या अनुषंगाने लोकसभेत १५ मार्च २००५ ला प्रश्नोत्तराच्या काळात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर तीनवेळा या मागणीवर लोकसभेत प्रश्न उपस्थित करून चर्चा झालेली आहे. दोनवेळा विदर्भातील खासदारांचे शिष्टमंडळ तत्कालीन राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भेटले. यापूर्वी अनेकदा लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्रेही पाठविली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत अशासकीय ठराव व विविध संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न उपस्थित करण्यात येऊन सविस्तर चर्चा झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने ८ जून २००६ रोजी एक शिफारसपत्र केंद्राच्या गृहविभागाला पाठविले आहे. गृहविभागाने २७ एप्रिल २०१२ ला पंतप्रधान कार्यालयाला शिफारस प्रस्ताव पाठविलेला आहे. परंतु या मागणीवर गेल्या १७ वर्षांच्या कालखंडात निर्णय होऊ शकला नाही. आजीवन ब्रह्मचर्य पाळून समाज व राष्ट्रहितासाठीच राष्ट्रसंतांनी कार्य केले. समाजात सदैव समन्वय साधण्याचे त्यांनी कार्य केले. म्हणून आजही त्यांची पुण्यतिथी, जयंती एकोप्याने समाजातील सर्व लोक साजरी करतात, अशा थोर क्रांतिकारी महामानवास भारत सरकारने येत्या २६ जानेवारी २०२१ ला गणराज्य दिनाचे ऒचित्य साधून भारतरत्न प्रदान करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.