शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

डास वाढल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:26 IST

चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. ...

चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. याचवेळी शहरातील काही भागांमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वच्छतेसह धूरफवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे काही भागात फवारणी केली जात असली, तरी ती केवळ नावापुरतीच आहे.

जिवतीतील समस्या अद्यापही कायमच

जिवती : दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील समस्या अद्यापही कायम आहेत. या समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी नागरी समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

घरकुुलासाठी नागरिकांना प्रतीक्षा

चंद्रपूर : दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविण्यात येते. गरजू लाभार्थ्यांना अद्यापही घरकुल मिळालेले नाही. त्यामुळे नव्याने याद्या तयार करून या लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी

चिमूर : तालुक्यातील अनेक गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती दिली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने घाणीचे साम्राज्य कायम आहे.

वीज देयकात सूट देण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील वीज उत्पादन प्रकल्पामुळे वायू, ध्वनी व जल प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानिर्मितीने उपाययोजना करायला हवी होती. परंतु, त्यांनी काहीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला आजारांवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कोरोना संकट काळात वीजबिल माफ करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे. मात्र, वीज देयकात सूट देण्यात आलेली नाही.

मोकाट जनावरांचा बसस्थानकावर ठिय्या

गडचांदूर : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसून राहतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरही हाच प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दूरसंचार सेवा सुरळीत करावी

घुग्घूस : भारतीय दूरसंचार विभागाकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ढिसाळ सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. खासगी कंपन्यांनी हातपाय पसरले तरी आजही हजारो ग्राहक दूरसंचारकडून सेवा घेतात. मात्र, इंटरनेट वारंवार बंद होत असल्याने व्यापारीही हैराण झाले आहेत.