चंद्रपूरच्या शिल्पकार राणी हिराईला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:51+5:30
जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, आदिवासी विद्यार्थी संघाचे कंटू कोटनाके, संजू मडावी, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री मंगाम, आदी उपस्थित होते.

चंद्रपूरच्या शिल्पकार राणी हिराईला अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर नगरीच्या शिल्पकार आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून देशभरातील तत्कालीन अनेक राजवटींमध्ये स्वत:च्या लक्षवेधी ठरलेल्या गोंड राणी हिराई यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त विविध आदिवासी संघटना तसेच चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, चिमूर, गोंडपिपरी, सावली, मूल, पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी लॉकडाऊनमुळे घराघरात कौटुंबीक कार्यक्रम घेऊन अभिवादन केले.
जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, आदिवासी विद्यार्थी संघाचे कंटू कोटनाके, संजू मडावी, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री मंगाम, आदी उपस्थित होते. बल्लारपूर व चंद्रपूर राजवटीत २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक होय. राणी हिराईचे माहेर मध्य प्रदेशातील मदनापूरचे. त्यांचे वडील सरदार होते. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच मिळाले. वीरशहा गादीवर बसला. राणी हिराईचा त्यांच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजवली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि राज्य कारभार बघू लागल्या. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला कल्याणकारी राज्य व्यवस्थेतून संस्कारीत केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. मात्र, त्याला निधड्या छातीने प्रतिकार केला. राणी स्वत: रणांगणावर उतरली. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. मात्र, राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर, महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा व हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविली, अशी माहिती प्रा.लक्ष्मण मंगाम यांनी दिली.
चंद्रपूरच्या विकासात बहुमोल वाटा- आचार्य टी. टी. जुलमे
चंद्रपूर नगरीच्या प्रजेचे हित जोपासत राणी हिराईने देखणी मंदिरे उभारली. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली चंद्रपुरातील मंदिरे व अन्य बआंधकाम केले. प्रजेला शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता पायाभूत सुविधा निर्माण केल्या. केवळ जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवून प्रजेला सुखी ठेवण्यात राणी हिराई यशस्वी झाल्या होत्या. त्या युद्ध कौशल्यात निपून होत्या. त्यामुळे राणी हिराईच्या कर्तृत्वाची दखल इतिहासकारांनी घेतली. राणी हिराईच्या कर्तृत्वामुळेच आजच्या चंद्रपूरला विकासाचे आधुनिक वळण घेतला आले, असे मत गोंड राजवटीचे अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.