शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

पुरस्कार परत घेण्याचे पोरखेळ थांबवा - संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 18:25 IST

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे सूप वाजले

चंद्रपूर (शांताराम पोटदुखे साहित्य परिसर ) : कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाला पुरस्कार घोषित करून परत घेण्याचे सरकारचे कृत्य सर्वत: निषेधार्ह आहे. हे कृत्य सरकारला शोभेसे नाही, पुरस्कार जाहीर करून परत घेण्याचा अक्षरश: पोरखेळ विद्यमान सरकारने चालविला आहे. हा पोरखेळ बंद करून सरकारनेच आता हा पुरस्कार लेखकांच्या घरी जाऊन ससन्मान प्रदान करावा, अशी मागणी ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. स. जोग यांनी केली.

गोंडवाना विद्यापीठ, सर्वाेदय शिक्षण मंडळ, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित ६८ व्या साहित्य संमेलनाचे सूप वाजले. समारोपप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रशांत पोटदुखे, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, विलास मानेकर, केंद्रीय प्रतिनिधी श्याम मोहरकर, कार्याध्यक्ष प्रमोद काटकर, सहकार्यवाह संजय वैद्य, सूर्यांशचे इरफान शेख, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे उपस्थित होते.

समारोपीय अध्यक्षीय भाषणात संमेलनाध्यक्ष डॉ. जोग यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी समारोपीय भाषणात ‘साहित्य संमेलनात राजकारणावर टीका केल्याशिवाय संमेलन गोड होत नाही. या संमेलन आयोजनात ज्या चुका झाल्या त्या आता होऊन गेल्या, भविष्यात चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे’, असे सांगितले. स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत बोकारे यांचेही भाषण झाले. यावेळी पल्याड चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश दुपारे यांचा तसेच आयोजन समिती व सूर्यांशच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन गीता देव्हारे-रायपुरे, आभार इरफान शेख यांनी मानले.

संमेलनात पाच ठराव पारित

महापुरुषांसंबंधी अवमानकारक व्यक्तव्ये जाहीरपणे करण्यास आल्याची घटना घडली आहे. लोकभावनेचा आणि जनमानसाचा विचार करता या प्रकारच्या घटना यापुढे घडू नये, असा ठराव पारित करण्यात आला. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील पाणीप्रश्न ही कळीचा प्रश्न झाला आहे. शासनाने अमृत योजना जाहीर करून सुद्धा त्याची पूर्तता झाली नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने या योजनेची पुनर्निरीक्षण करून ती पूर्णतः कार्यान्वित करावी, जाहीर झालेल्या पुरस्कार परत घेणे हा साहित्यिक कलावंतांचा अपमान आहे. शासनाच्या या कृतीवर असमाधान व्यक्त करीत अशा प्रकारची कृती पुढे होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी असा ठराव शासनाकडे पाठवण्यासंबंधी ठराव केला. वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस आधकातिकारक म्हणून शासनाने जाहीर करावा जिल्हा व तालुका स्तरावरील संस्थाना संमेलन घेण्यासाठी डीपीडीसीतून मदत करावी असा ठराव घेतला गेला.

टॅग्स :literatureसाहित्यVidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघchandrapur-acचंद्रपूरSocialसामाजिक