शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

सरकारने राष्ट्रसंताना भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करुन राष्ट्रकार्याचा यथोचित सन्मान व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 18:48 IST

राष्ट्रसंत साहित्याचा  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात समावेश व्हावा. 

चंद्रपूर: आज गावागावात सामुदायिक जीवनाची दृष्टी  विकसित करण्याची गरज आहे. सक्षम ग्रामसभा, ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव झाल्यास देशाचे चित्रच पालटेल.  हे कार्य श्री संत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आयुष्यात बदल घडतात. गावात बदल घडून येतात. सर्व धर्माचा समन्वय हाच विश्व शांतीचा उपाय राष्ट्रसंतानी सांगितलेला आहे. ग्रामगीतेनुरूप सामुहिक जीवनाच्या जागृतीची लाट निर्माण झाली पाहिजेत , असे प्रतिपादन म.रा. पंचायतराज  तज्ज्ञ समिती सदस्य चंदू पाटील मारकवार यांनी समारोप प्रसंगी पेंढरीत केले. 

राष्ट्रसंत  साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप रविवारी दुपारी झाला. अध्यक्षस्थानी चंदू मारकवार होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत कोकोडे ,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ श्रीगुरूदेव उपासक  गुलाब चौधरी , मुख्याद्यापक  सुभाष शिंदे , मधुसूदन दोनोडे , जि.प.सदस्य रमाकांत लोधे , ॲड. राजेंद्र जेनेकर , दिवाकर चाचरकर ,अरविंद किरीमकर , डॉ. विठ्ठल चौथाले ,पुणे येथील पंढरीनाथ चंदनखेडे , प्रदीप अडकीने ,घनश्याम चौके , सुर्यभान चौके आदी उपस्थित होते . 

समारोपिय कार्यक्रमात ॲड.भुपेश पाटील नागपूर , सुरेश डांगे चिमूर , विनायक बावणे वर्धा, संजय वैद्य वरोरा , सौ.मिरा मुळे अड्याळटेकडी , नंदू पिंपळकर चंद्रपूर , अमरनाथ जिवतोडे राजुरा , शशीकला सोनुले ,चंद्रकला पराते , पार्वता गुरनुले ,भास्कर वाढई, विलास चौधरी  ,बाळकृष्ण कवाडकर   आदींना संमेलन समितीच्या वतीने  विविध सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

संमेलन समितीच्या वतीने मांडलेले चार ठराव टाळ्या वाजवून सर्वानुमते पारित करण्यात आले.

१. भारत सरकारने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज मरणोत्तर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे. 

२. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे  अभिनंदन करणारा ठराव घेण्यात आला.  

३. सिंदेवाही ते चिमूर ही बससेवा रात्री दहावाजेपर्यंत सुरू व्हावी .

४. राष्ट्रसंत साहित्याचा  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात समावेश व्हावा. 

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कोकोडे म्हणाले , राष्ट्रसंताचे साहित्य हे पवित्र साहित्य असून जनसामान्यांना प्रतिष्ठा देणारे अमोघ वाड्-मय आहे.त्यामुळे ग्रामगीतेचे वाचन चिंतन  गावाच्या पारावर झाले पाहिजे .त्यानुसारच आता भागवत, कीर्तन झाले पाहिजे. ग्रामगीतेनुरूप कृती झाल्यास देशाची परिस्थिती पालटू शकेल असे ते म्हणाले. सकाळच्या सत्रात अनुभवकथन कार्यक्रम श्रीकांत धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात  सतिश लोंढे, पंढरी चंदनखेडे , महादेव हुलके, हरी बोढे, विजय चिताडे , आशा बुरडकर, वृंदा हुलके, विलास उगे, खूशाल गोहोकार आदींनी आपले ग्रामगीतेनुरूप अनुभव कथन सादर केलेत तर महिला संघटनेची गरज या विषयावरील  परिसंवाद प्रा.डॉ. माधुरी कोकोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला .यात ॲड. सारिका जेनेकर , जयश्री माथने , रोहिणी मंगरूळकर ,  मिरा मुळे यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन रीता वैद्य यांनी केले तर आभार सुवर्णा कावळे  मानले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र