शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

शासनाची शंभर एकर जमीन पडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:58 IST

सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे.

ठळक मुद्देलाखोंचे उत्पन्न बुडाले : कोट्यवधीची संपत्ती धूळखात

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे. या शेतातील धान उत्पादनातून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच कोट्यवधीची संसाधने धूळ खात असल्याचेही पहावयास मिळत आहे.या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका बीजगुणक प्रक्षेत्र बोथली नावाने शंभर एकर शेती शासनाने हस्तांतरित करुन उत्पादन घेण्यायोग्य बनवली. लाखो रुपये खर्च करुन त्या शेतीची सुधारणा केली. मात्र मागील चार- पाच वर्षापासून या शेतीतून उत्पन्न घेण्यात कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कृषी उपविभाग चंद्रपूर यांच्याकडे सदर शेतीचे व्यवस्थापन असून तेथील देखभाल व उत्पादन घेण्यासाठी मिश्रा नामक एका कृषी सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या शेतीकडे कुणाचेही लक्ष नाही. एवढेच नव्हे तर या शंभर एकर शेती परिसरात असलेली कृषी विभागाची कोट्यवधीची वनसंपदाही वाºयावर सोडण्यात आली आहे.या शेतातून एकरी २० क्विंटल धानाचे उत्पादन जरी गृहित धरले आणि प्रति सरासरी दोन हजार रुपये भावाच्या हिशोबाने ४० लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत होते. खर्च वजा जाता किमान २० लक्ष रुपयांच्या शुद्ध नफ्यापासून शासन वंचित झाले आहे. याशिवाय कोट्यवधी रुपये खर्चून उपलब्ध करण्यात आलेली संसाधने धूळ खात पडलेली पहावयास मिळत आहेत.सावली नगरापासून दहा किमी अंतर असलेल्या तालुका वीज गुणक प्रक्षेत्र बोथली येथे सदर प्रतिनिधीने भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली असता उपलब्ध संसाधनाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले. या शेतातून उत्पन्न घेण्यासाठी दोन मोठ्या विहिरी, १.५ अश्वशक्तीचे आईल इंजीन, ३.५ अश्वशक्तीची विद्युत मोटार, एक जेट पंप, एक स्प्रिंकलर प्रिमीयम संच, ४६८ मीटरचे पीव्हीसी पाईप, याशिवाय धान्य साठविण्याकरिता तीन गोदाम, एक ट्रॅक्टर, आणि जीर्ण अवस्थेतील कार्यालयांचा समावेश आहे. अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची संपत्ती सध्या बेवारस आहे.या तालुका बीजगुणक प्रक्षेत्र केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित वाणांचे व प्रजातींचे संशोधन करण्यात यावे आणि शेतकºयांच्या उत्पादनात भर पडावी, हा प्रशासनाचा हेतू होता. मात्र कृषी उपविभागीय कार्यालय चंद्रपूरच्या उदासीनतेमुळे या शासनाच्या उदात्त हेतुलाच हरताळ फासण्याचे काम विद्यमान अधिकाºयांकडून, कर्मचाºयांकडून केले जात आहे. या परिसरात आंबा, चिक्कू, करवंद, आवळा, खिरव्या यासारख्या फळझाडांसोबतच साग वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ही वनसंपदासुद्धा लाखो रुपयांच्या घरात आहे. असेच दुर्लक्ष झाले तर ही वनसंपदासुद्धा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या परिसरात असलेल्या शासनाच्या अनेक मौल्यवान मोटारींचीही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शेती योग्य असणारी जमीन गेल्या चार वर्षापासून पडित असल्यामुळे गुरांचे कुरण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकरी आपल्या गुरांना चरण्यासाठी या शेतात आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. घनदाट जंगल परिसराच्या मध्यभागी असलेल्या संसाधनांची सुरक्षा करण्याकरिता एका वृध्दाची नेमणूक करण्यात आली, हे विशेष.