शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

शासनाची शंभर एकर जमीन पडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:58 IST

सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे.

ठळक मुद्देलाखोंचे उत्पन्न बुडाले : कोट्यवधीची संपत्ती धूळखात

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : सावली तालुक्यातील कृषी विभागाच्या अखत्यारित असलेली सुमारे शंभर एकर जमीन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पडित आहे. या शेतातील धान उत्पादनातून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच कोट्यवधीची संसाधने धूळ खात असल्याचेही पहावयास मिळत आहे.या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तालुका बीजगुणक प्रक्षेत्र बोथली नावाने शंभर एकर शेती शासनाने हस्तांतरित करुन उत्पादन घेण्यायोग्य बनवली. लाखो रुपये खर्च करुन त्या शेतीची सुधारणा केली. मात्र मागील चार- पाच वर्षापासून या शेतीतून उत्पन्न घेण्यात कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कृषी उपविभाग चंद्रपूर यांच्याकडे सदर शेतीचे व्यवस्थापन असून तेथील देखभाल व उत्पादन घेण्यासाठी मिश्रा नामक एका कृषी सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या शेतीकडे कुणाचेही लक्ष नाही. एवढेच नव्हे तर या शंभर एकर शेती परिसरात असलेली कृषी विभागाची कोट्यवधीची वनसंपदाही वाºयावर सोडण्यात आली आहे.या शेतातून एकरी २० क्विंटल धानाचे उत्पादन जरी गृहित धरले आणि प्रति सरासरी दोन हजार रुपये भावाच्या हिशोबाने ४० लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत होते. खर्च वजा जाता किमान २० लक्ष रुपयांच्या शुद्ध नफ्यापासून शासन वंचित झाले आहे. याशिवाय कोट्यवधी रुपये खर्चून उपलब्ध करण्यात आलेली संसाधने धूळ खात पडलेली पहावयास मिळत आहेत.सावली नगरापासून दहा किमी अंतर असलेल्या तालुका वीज गुणक प्रक्षेत्र बोथली येथे सदर प्रतिनिधीने भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली असता उपलब्ध संसाधनाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले. या शेतातून उत्पन्न घेण्यासाठी दोन मोठ्या विहिरी, १.५ अश्वशक्तीचे आईल इंजीन, ३.५ अश्वशक्तीची विद्युत मोटार, एक जेट पंप, एक स्प्रिंकलर प्रिमीयम संच, ४६८ मीटरचे पीव्हीसी पाईप, याशिवाय धान्य साठविण्याकरिता तीन गोदाम, एक ट्रॅक्टर, आणि जीर्ण अवस्थेतील कार्यालयांचा समावेश आहे. अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची संपत्ती सध्या बेवारस आहे.या तालुका बीजगुणक प्रक्षेत्र केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित वाणांचे व प्रजातींचे संशोधन करण्यात यावे आणि शेतकºयांच्या उत्पादनात भर पडावी, हा प्रशासनाचा हेतू होता. मात्र कृषी उपविभागीय कार्यालय चंद्रपूरच्या उदासीनतेमुळे या शासनाच्या उदात्त हेतुलाच हरताळ फासण्याचे काम विद्यमान अधिकाºयांकडून, कर्मचाºयांकडून केले जात आहे. या परिसरात आंबा, चिक्कू, करवंद, आवळा, खिरव्या यासारख्या फळझाडांसोबतच साग वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. ही वनसंपदासुद्धा लाखो रुपयांच्या घरात आहे. असेच दुर्लक्ष झाले तर ही वनसंपदासुद्धा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या परिसरात असलेल्या शासनाच्या अनेक मौल्यवान मोटारींचीही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शेती योग्य असणारी जमीन गेल्या चार वर्षापासून पडित असल्यामुळे गुरांचे कुरण झाले आहे. परिसरातील अनेक शेतकरी आपल्या गुरांना चरण्यासाठी या शेतात आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. घनदाट जंगल परिसराच्या मध्यभागी असलेल्या संसाधनांची सुरक्षा करण्याकरिता एका वृध्दाची नेमणूक करण्यात आली, हे विशेष.