शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

महात्मा गांधीजींचे ऐकले तरच खादीला चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:47 IST

खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढतील.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योग संकटातपंचसूत्रीकडे दुर्लक्ष

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा गांधीजींना भारताच्या ग्रामीण समाजव्यवस्थेचे खरे दुखणे माहित होते. ब्रिटीशांना देशातून चले जाव हा निर्वाणीचा इशारा देण्यापूर्वीच येथील गोरगरीबांच्या जगण्याचे पर्याय काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यातून खादी चळवळ सुरू झाली. मात्र, ही चळवळ आता संकटात सापडली, याबाबत महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त चंद्रपूर येथील खादी चळवळीचे अभ्यासक व प्रचारक जागेश सोनडुले यांच्याशी साधलेला संवाद...जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योगांची वर्तमान स्थिती कशी आहे?महात्मा गांधीजींनी खादी वस्त्रांना स्वातंत्र्य, स्वावलंन व ग्रामविकासाशी जोडले होते. खादीची ही परिभाषा स्वीकारूनच पाच-सहा संस्था उभ्या झाल्या. सावली, मूल येथील खादी केंद्र उभारण्यास गांधीजींचा प्रत्यक्षात सहभाग होता. गावातील उपलब्ध साधनांचा वापर करून मूल्यवर्धन केल्याने खादीला चांगले दिवस होते. सरकारने देशात राष्ट्रीय खादी व राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे भक्कम पाठबळ मिळाल्याने रोजगाराची व्याप्ती वाढली. स्थानिक संसाधने, उत्पादन, मूल्यवर्धन, विक्री व रोजगार या पंचसूत्रीने हजारो महिलांना बळ दिले. आजचे चित्र निराशाजनक आहे. खादी म्हणजे केवळ अंगावरचे वस्त्र नव्हे तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा उद्योग आहे.खादी ग्रामोद्योगाला संकटात कुणी ढकलले ?चुकीच्या धोरणांमुळे हे संकट निर्माण झाले. मानवी श्रमाचे मूल्य नाकारून काही कंपन्यांना अनुकूल धोरण राबविल्याचा हा परिपाक आहे. बदलत्या काळानुसार काही बदल अपेक्षित असले तरी गांधीजींची खादी परिभाषा टाळल्यास ग्रामीण अर्थवस्था व त्यावरील उपजिविका अडचणीत येते. त्याचेच दृष्य परिणाम दिसत आहेत.तरूणाईला खादीचे आकर्षण का नाही ?आजच्या तरूण पिढीला खादी वस्त्रांचे आकर्षण का नाही, असे विचारताच जागेश सोनडुले म्हणाले, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एक मोठे उद्योगपती आले होते. त्यांनी खादीचा फुल पॅन्ट घातला होता. तोही हातमागावर तयार केलेला! आकर्षण सर्वांनाच आहे. मात्र, खादी खूप महाग असते, ही मानसिकता अद्याप बदलली नाही. त्यासाठीच उज्वला खादी व ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या माध्यमातून मी परिवर्तनाचे काम करतो. युवक-युवतींना समजावून सांगतो. कार्यशाळा घेतो. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यातील प्रशिक्षण बंद आहेत.खादी ग्रामोद्यागाचे भविष्य काय?खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढतील.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खादी मिशन सूचनेनुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पारंपरिक दागिन्यांबाबत एक प्रस्ताव पाठविण्यात आला. जिवती तालुक्यातील टाटा कोहाळ या मॉडेल गावात तुती लागवड व वन औषध प्रक्रिया उपक्रम सुरू करणार आहे.

टॅग्स :Khadiखादी