शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

महात्मा गांधीजींचे ऐकले तरच खादीला चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:47 IST

खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढतील.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योग संकटातपंचसूत्रीकडे दुर्लक्ष

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा गांधीजींना भारताच्या ग्रामीण समाजव्यवस्थेचे खरे दुखणे माहित होते. ब्रिटीशांना देशातून चले जाव हा निर्वाणीचा इशारा देण्यापूर्वीच येथील गोरगरीबांच्या जगण्याचे पर्याय काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यातून खादी चळवळ सुरू झाली. मात्र, ही चळवळ आता संकटात सापडली, याबाबत महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त चंद्रपूर येथील खादी चळवळीचे अभ्यासक व प्रचारक जागेश सोनडुले यांच्याशी साधलेला संवाद...जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योगांची वर्तमान स्थिती कशी आहे?महात्मा गांधीजींनी खादी वस्त्रांना स्वातंत्र्य, स्वावलंन व ग्रामविकासाशी जोडले होते. खादीची ही परिभाषा स्वीकारूनच पाच-सहा संस्था उभ्या झाल्या. सावली, मूल येथील खादी केंद्र उभारण्यास गांधीजींचा प्रत्यक्षात सहभाग होता. गावातील उपलब्ध साधनांचा वापर करून मूल्यवर्धन केल्याने खादीला चांगले दिवस होते. सरकारने देशात राष्ट्रीय खादी व राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे भक्कम पाठबळ मिळाल्याने रोजगाराची व्याप्ती वाढली. स्थानिक संसाधने, उत्पादन, मूल्यवर्धन, विक्री व रोजगार या पंचसूत्रीने हजारो महिलांना बळ दिले. आजचे चित्र निराशाजनक आहे. खादी म्हणजे केवळ अंगावरचे वस्त्र नव्हे तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा उद्योग आहे.खादी ग्रामोद्योगाला संकटात कुणी ढकलले ?चुकीच्या धोरणांमुळे हे संकट निर्माण झाले. मानवी श्रमाचे मूल्य नाकारून काही कंपन्यांना अनुकूल धोरण राबविल्याचा हा परिपाक आहे. बदलत्या काळानुसार काही बदल अपेक्षित असले तरी गांधीजींची खादी परिभाषा टाळल्यास ग्रामीण अर्थवस्था व त्यावरील उपजिविका अडचणीत येते. त्याचेच दृष्य परिणाम दिसत आहेत.तरूणाईला खादीचे आकर्षण का नाही ?आजच्या तरूण पिढीला खादी वस्त्रांचे आकर्षण का नाही, असे विचारताच जागेश सोनडुले म्हणाले, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एक मोठे उद्योगपती आले होते. त्यांनी खादीचा फुल पॅन्ट घातला होता. तोही हातमागावर तयार केलेला! आकर्षण सर्वांनाच आहे. मात्र, खादी खूप महाग असते, ही मानसिकता अद्याप बदलली नाही. त्यासाठीच उज्वला खादी व ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या माध्यमातून मी परिवर्तनाचे काम करतो. युवक-युवतींना समजावून सांगतो. कार्यशाळा घेतो. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यातील प्रशिक्षण बंद आहेत.खादी ग्रामोद्यागाचे भविष्य काय?खादी ग्रामोद्योग विकासाचे धोरण गांधी विचारांना छेद देऊ नये. कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य खादीत आहे. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद द्यावे. गांधीप्रणीत खादीचा प्रचार-प्रसार करावा, खादी संस्थांना प्रोत्साहन दिल्यास रोजगाराची साधने वाढतील.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खादी मिशन सूचनेनुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पारंपरिक दागिन्यांबाबत एक प्रस्ताव पाठविण्यात आला. जिवती तालुक्यातील टाटा कोहाळ या मॉडेल गावात तुती लागवड व वन औषध प्रक्रिया उपक्रम सुरू करणार आहे.

टॅग्स :Khadiखादी