शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

इरई नदीला हवा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:17 IST

चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे प्रथम वाटोळे करण्यात आले.

ठळक मुद्देसिंचन विभाग हतबल : खोलीकरणाचे काम ठप्प

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे प्रथम वाटोळे करण्यात आले. त्यानंतर आंदोलने केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि इरई नदीच्या खोलीकरणासाठी प्रयत्न करू लागले. अखेर यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आणि २०१५ मध्ये नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. पावसाळ्यात हे काम थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर हिवाळा लोटत असतानाही खोलीकरणाचे काम ठप्पच आहे. निधी नसल्यामुळे सिंचन विभागही आपली हतबलता दाखवित आहे.अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांनी इरई नदीचे वाटोळे केले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे आहेत. या ढिगाºयामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.यावर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर काम सुरूच करण्यात आले नाही. हिवाळा लोटत असतानाही खोलीकरणाचे काम सुरू झालेले नाही. सिंचन विभाग निधीच नसल्याचे कारण पुढे करीत आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.राजेंद्र सिंग यांनी लक्ष द्यावेनागपूर विभागात जलसाक्षरता केंद्र उभारण्यासाठी चंद्रपूरची निवड केली आहे. या केंद्राच्या उद्घाटनासाठी सोमवारी जलपुरुष राजेंद्र सिंग, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे चंद्रपुरात येत आहेत. पाण्याशी संबंधित एक नवा अध्याय सोमवारी चंद्रपूरशी जुळला जाणार आहे. अशावेळी इरई नदीसाठी तत्काळ निधी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी पर्यावरणवांद्यांची आहे.असे झाले खोलीकरण२० मे २०१५ रोजी इरई नदीच्या खोलीकरणाला प्रारंभ झाला. प्रथम पडोली पुलापासून दाताळा पुलापर्यंत १५० मीटरपर्यंत नदीपात्राचे खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दाताळा पुलापासून चौराळा पुलापर्यंतच्या पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. हडस्तीजवळच्या वर्धा नदीच्या संगमापर्यंत इरई नदीचे खोलीकरण करणे प्रस्तावित आहे. मात्र हे काम आता रखडले आहे.