२४ तासात ३९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:48+5:302021-01-14T04:23:48+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १४ ...

Free 39 corona in 24 hours | २४ तासात ३९ कोरोनामुक्त

२४ तासात ३९ कोरोनामुक्त

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून, दोन मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ७५६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ५८ झाली आहे. सध्या ३१८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८७ हजार ३९० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ६२ हजार ६७० नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चामोर्शी येथील ६३ वर्षीय पुरुष व बल्लारशा येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८० बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १२, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या १४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सात, बल्लारपूर एक, भद्रावती तीन, राजुरा एक, वरोरा एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Free 39 corona in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.