शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

चार दाणे चिमण्या-पाखरांना देऊ या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:16 IST

लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या मनात येत नसले तरी त्याकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ्या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे. यावर दाण्यातून कुणाच्या दोन वेळेच्या जेवणची सोय होऊ शकते, हे विसरता कामा नये.

ठळक मुद्देलग्नमंडपात तांदळाचा खर्च : पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या मनात येत नसले तरी त्याकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ्या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे. यावर दाण्यातून कुणाच्या दोन वेळेच्या जेवणची सोय होऊ शकते, हे विसरता कामा नये.लग्न वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची पध्दत अनादी काळापासून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते. लग्न लावताना हातात अक्षता म्हणून तांदळाला कुंकू व ज्वारीला हळद लावण्यात येते. आजघडीला अक्षता वाटण्याच्या पध्दती बदललेल्या आहेत. मंडपात प्रवेश होताच प्लास्टिकच्या छोट्या पाकिटात तांदळाची व दुसऱ्या पाकिटात ज्वारीची अक्षता हातात पडते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर मंडपात कुठ प्लास्टिकची रिकामी पाकिटे तर कुठे रंगबेरंगी तांदळाचा सडा दिसून येतो. मंडपात असणाऱ्यांचे याकडे लक्ष जाते. मात्र कुण्या गरजवंताची चार मुले जगू शकतील. याचा विचार कुणाच्याच मनात येत नाही.लग्न समारंभ दिवसेंदिवस प्रतिष्ठेत सोहळा ठरला आहे. या प्रतिष्ठेमुळे धान्य पायदळी तुडवल्या जात आहे. मात्र, त्यात बदल करण्याची इच्छा कुणाच्याही मनात येत नाही. जीवनाचे वास्तव सांगणाºया राष्टÑसंतानी या गोष्टीचा उलगडा तेव्हाच केला होता. त्यांनी सांगितलेले वास्तव अनेकांना कळते असले, तरी अंमलबजावणी मात्र कुणीही करीत नसल्याचेच दिसून येते आहे.आतातरी तांदळाचे महत्व लक्षात घेता पूरातन रूढी परपंरेचा पगडा मिरविणे सोडून तांदळाची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेतल्यास यावर आळा बसू शकेल. यासाठी जनजागृतीची गरज आहे.रूढी झाली पध्दतलग्नात वधू- वरांच्या डोक्यावरत अक्षता टाकतात. ही पध्दत पुरातन आहे. अक्षता हे पुर्णतेचे लक्षण आहे. धान्यात तांदूळ हे संपन्नतेचे लक्षण असल्यामुळे हा प्रकार सुरू झाला आहे. प्राचीन काळापासून देशात धान्याच्या अक्षता तयार करून त्या वधू वरांच्या डोक्यावर टाकण्याची ही प्रथा आजही कायम आहे. अन्न हे पोट भरण्याचे साधन आहे.अन्न पायाखाली आल्यास त्याचा अपमान होतो, असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. अन्न वाचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. परंतु लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात धान्य पायदळी तुडविले जातात.पाखरांना धान्य देण्याकडे कानाडोळावाढत्या उन्हात पक्षांना अन्न मिळणे कठिण होत आहे. यामुळे छतावर घरी असलेल्या झाडावर पाणी आणि अन्न ठेवण्याची गरज आहे.वाया घालणार पण देणार नाहीलग्न समारंभात अक्षतांच्या नावावर धान्य फेकणाऱ्यांकडे जर कुणी धान्य मागण्याकरिता गेले तर त्याला समोर जा, असे सांगून हाकलून लावणारे अनेक महाभाग आहेत. मात्र, विवाहाची वेळ आल्यास धान्याची उधळण करीत प्रतिष्ठा जोपासणारेही कमी नाहीत.फुलांना पसंतीकुणाचे स्वागत करायचे असेल, तर फलांचा वापर करण्यात येतो. फुलाशिवाय स्वागत अशक्यच असल्याचे असते. फुलाशिवाय धार्मिक कार्य होत नाही. लग्नाच्या वेळी नवदाम्पत्याचे स्वागत फुलांच्या माध्यमातून केले तर वावगे काय. वधू वरांच्या डोक्यावर अक्षता फेकण्यापेक्षा त्यांच्यावर पुष्पावर्षाव करण्याचा विचार करणे गरजेचे आहे.