शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाची सक्ती करा!

By admin | Updated: December 22, 2016 01:52 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये तसेच शाळा येथील ग्रामसेवक,

विकासही अडला : नागरिकांची कामे खोळंबली गुंजेवाही : राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये तसेच शाळा येथील ग्रामसेवक, पटवारी, शिक्षक, सिंचन विभागाचे क्लर्क यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश असतानाही त्या आदेशाला न जुमानता मुख्यालयी राहत नसल्याने जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्याची पाठराखन करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण जनतेला माहिती नसते. गावातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी व तलाठी, शिक्षक आहेत. त्यामुळे सदर कर्मचारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी जर ग्रामीण भागात मुख्यालयी असला तरी गावाचा विकास झपाट्याने होतो. ज्यावेळी शासकीय सेवेमध्ये रूजू होत असताना मुख्यालयी राहण्याची अट असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्तासुद्धा दिला जातो. परंतु त्या आदेशाला न जुमानता गरजेनुसार वागणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे वागत आहेत. प्रशासनाने कर्मचाऱ्याकरिता १५ टक्के प्रोत्साहन भत्ता व एक स्तर पदोन्नती लागु केली आहे. याचा लाभ घेणारे ८० टक्के कर्मचारी आपल्या सोयीनुसार तालुक्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. कधी वेळेवर तर कधी वेळेनंतर. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामविकास अधिकारी, पटवारी (तलाठी), डॉक्टर, शिक्षक, सुपरवाझर, केंद्र प्रमुख हे मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अध्यापनाच्या काळात शिक्षकांच्या सोबत असतात. ग्रामीण क्षेत्रात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांकरीता शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. मुख्यालयी शिक्षक राहत नसल्याने विद्यार्थ्यांवर वचक बसत नाही. पालकांचा शिक्षणाकडे कल कमी असतो. ग्रामीण भागाकडे पंचायत राज समितीचा दौराही येताना दिसत नाही. केवळ कागदावर अहवाल सादर केले जातात. याला प्रशासनच जबाबदार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र जनतेनी निवडुन दिलेले प्रतिनिधीही कर्मचाऱ्यावर वचक ठेवीत नसल्यामुळे कर्मचाऱ्याची मनमानी दिसून येत आहे. कर्मचारी स्वत:च्या कुटुबांच्या विकासाकरिता शहरी भागामध्ये ठाण मांडून बसतात. तालुक्याच्या ठिकाणात राहुन मोटारसायकलने ये-जा करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटत आहे. ग्रामविकास अधिकारी व तलाठी व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गावाच्या विकासाची गती दिवसेंदिवस कमी होत आहे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रासाठी हेलपाटे खावे लागत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)