शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

ग्रामस्थांनी बुजविले पाच किमीवरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:52 AM

विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देप्रशासन मूग गिळून : श्रमदानासाठी सरसावले नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. संबंधित प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. शेवटी सुब्बई येथील शिवाजी आश्रमशाळेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांनीच श्रमदानातून पाच किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासनाला चांगलीच चपराक दिली आहे.राजुरापासून ३४ कि.मी. अंतरावर सुब्बई हे गाव आहे. माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांचे मूळ गाव आहे. परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे येतात. राजुरा-विरूर-सुब्बई मार्गाची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील ये-जा करणाºया नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रुग्णवाहिकांना खड्डे पार करताना प्रचंड कसरत करावी लागते. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. मात्र वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काल मंगळवारी माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात गावकरी व विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले. रखरखत्या उन्हातही गावकरी व विद्यार्थ्यांनी हातात फावडे, टोपल्या घेऊन पाच कि.मी. लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले. स्वत: उपस्थित राहून श्रमदान करताना प्रोत्साहित केले.या श्रमदान अभियानात गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी शिवाजी आश्रमशाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, आॅटोचालक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्याध्यापक डी.एस. झाडे, अंगलवार, सरपंच गजानन आत्राम, बळीराम चव्हाण, बालेश पुप्पलवार, वानखेडे, नागोसे, राठोड, मोरे, प्रशांत पवार, चंदू चापले, भाऊजी जाभोर, बाबाजी डोहने, कोरवते, सोनी व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी श्रमदान करून सामाजिक आदर्श निर्माण केला.दुर्गम भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करावे. ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दखल घ्यावी.- प्रभाकर मामूलकरमाजी आमदार, राजुरा