स्त्री भ्रूणहत्या हा सामाजिक कलंकच
By Admin | Updated: January 19, 2016 00:44 IST2016-01-19T00:44:47+5:302016-01-19T00:44:47+5:30
स्त्री शक्तीची उज्ज्वल परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. अनेक थोर स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वातून या राष्ट्राच्या उभारणीत योगदान दिले आहे.

स्त्री भ्रूणहत्या हा सामाजिक कलंकच
अर्चना डेहनकर : स्त्रीशक्तीच्या जागराने युवती संमेलनाचे सूप वाजले
चंद्रपूर : स्त्री शक्तीची उज्ज्वल परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. अनेक थोर स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वातून या राष्ट्राच्या उभारणीत योगदान दिले आहे. आज स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे राहिली नसताना व तिचे पत्नी, भगिनी व माता हे अस्तित्व अनंत काळापासून टिकून असताना स्त्रीभ्रूण हत्येसारखा प्रकार या देशात घडतो, ही शोकांतिकाच नसून सामाजिक अभिशाप आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या अर्चना डेहनकर यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा महिला आघाडी चंद्रपूर महानगरच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक आयएमए हॉल गंजवार्ड येथे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ युवती महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनाचा सोमवारी समारोप झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आ. नाना शामकुळे होते. या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा वनिता कानडे, प्रदेश युवा मोर्चाच्या सरचिटणीस अर्चना डेहनकर, भाजपाचे जिल्हा महासचिव संजय गजपुरे, जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार, डॉ.मंगेश गुलवाडे, मोहन चौधरी, आशा आबोजवार, नगरसेविका ललिता गराट, माया उईके, रत्नमाला वायकर, सुषमा नागोसे, शिला चव्हाण आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक या महासंमेलनाच्या जिल्हा संयोजिका स्मिता नंदनवार यांनी केले. या युवती महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित वक्तृत्व, रांगोळी व चित्रकला स्पर्धेत अनेक शाळांमधील युवतींनी सहभाग घेतला.
विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. आभार वनश्री मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्षा कोठेकर, राहुल लांजेवार, रोशण ढवळे, प्रणीती चौधरी यांची सहकार्य लाभले.
संमेलनाचा बहुसंख्य युवतींनी लाभ घेतला. (शहर प्रतिनिधी)