शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार - भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:41 IST

वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे.

चंद्रपूर – वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य  भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपुरात पोहचली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे. 

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे. विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास शक्य नाही़ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आपली आत्मबळ यात्रा सुरू असून, विदभार्साठी सर्व पर्याय खुले आहेत़. वेळ आल्यास आमदारकीचा त्याग करू. त्यामुळे भाजपाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार आशिष देशमुख यांनी करीत भाजपाला घरचा अहेर दिला़.  शेतकरी, बेरोजगार युवकांच्या समस्यांसह स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे काटोलचे आमदार डॉ़ आशिष देशमुख यांनी विदर्भ आत्मबळ यात्रा काढली. ही यात्रा गुरूवारी चंद्रपुरात पोहोचली़ यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपा सरकारच्या धोरणावर टिका केली. सुरुवातीपासूनच आपण विदर्भ राज्यासाठी संघर्ष करीत असून, यापूर्वी बेमुदत उपोषणसुद्धा केले होते़ त्यावेळी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सरकार सत्तेवर येताच विदर्भ राज्य करू, असे आश्वासन दिले होते़. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा विदर्भ राज्यासाठी अशासकीय ठरावसुद्धा मांडले आहेत़ मात्र, त्यांनी आता विदर्भ राज्याच्या मागणीवर चुप्पी साधली आहे, असे ते म्हणाले.

विदर्भात सर्वाधिक वीजनिर्मिती होते. सर्वाधिक कोळसा उत्पादन होते़ या उद्योगिकीकरणामुळे निर्माण प्रदूषणाचे चटके येथील जनतेला बसत आहे़ मात्र, येथील जनतेला २४ तास वीज मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली़भाजपा सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे़ आगामी काळात हा रोष दिसून, येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले़ विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपाचे आणखी काही आमदार आपल्यासोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.शंकरपूर, भिसीत स्वागतआमदार आशिष देशमुख यांच्या विदर्भ आत्मबळ यात्रेचे शंकरपूर व भिसीत दुपारच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्या सोबत जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजूकर, डॉ. रमेश गजबे, पं.स. सदस्य रोशन ढोक, भावना बावणकर, अमोद गौरकर, रामभाऊ भांडारकर, शामराव बोरकर, नितीन सावरकर, मोरेश्वर झाडे, प्राचार्य जाने यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी भिसीच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शंकरपूर येथेही सभा झाली.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा