शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

भय इथले संपत नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

मागील काही दिवसांपासून वाघ सातत्याने हल्ले करीत असल्याने त्यांच्या आक्रमकतेपुढे शेतकरी हतबल ठरले आहेत. वाघांनी केलेल्या हल्ल्यांत आजपर्यंत एकट्या कोलारा परिसरात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला होता.

ठळक मुद्देतीनपैकी एक वाघ जेरबंद : कोलारा परिसरातील अनेक गावे वाघाच्या दहशतीत

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वाघांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आजघडीला दोनशेच्या जवळपास वाघाची संख्या आहे. वाढत्या संख्येमुळे वाघ गावशेजारी आले आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून कोलारा, मासळ परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. शेतीच्या कामासाठी गेलेल्या दोन तर मोहफुल, तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या तीन अशा पाच जणांना वाघाने ठार केले आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जात असताना मृत्यू समोर वाट बघत असल्याचे चित्र कोलारा परिसरातील गावात दिसत आहे. पाच जणांचा बळी घेणाऱ्या (केटी,१) वाघाला वन विभागाने बुधवारी जेरबंद केले. मात्र जेरबंद केलेल्या वाघाची आई व एक बछडा आजही त्या परिसरात आहेत. ताडोबा लागूनच असल्याने दुसरेही वाघ आहेतच. त्यामुळे किती वाघांना वनविभाग जेरबंद करणार आणि नागरिकांतील भय कधी संपणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.मागील काही दिवसांपासून वाघ सातत्याने हल्ले करीत असल्याने त्यांच्या आक्रमकतेपुढे शेतकरी हतबल ठरले आहेत. वाघांनी केलेल्या हल्ल्यांत आजपर्यंत एकट्या कोलारा परिसरात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला होता. याची दखल घेत वनविभागाने त्या चवताळलेल्या केटी १ वाघाला जेरबंद करून मासळ, कोलारा, बामनगाव, सातारा गावातील नागरिकांना दिलासा दिला आहे. असे असले तरी जेरबंद केलेल्या वाघाची आई शर्मिली व त्याचा एक भाऊ अजून त्या परिसरात आहे. ते चवताळून या परिसरात हल्ला करेल, अशीही भीती आहे.ताडोबा प्रकल्पाबाहेरही वाघांचा वावरताडोबा अंधारी प्रकल्प हे खास वाघासाठी आरक्षित अभयारण्य असले, तरीही जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर तालुक्यातील जंगल परिसरात वाघाची उत्पत्ती झाली आहे. विशेषता चिमूर, ब्रह्मपुरी तालुका आणि त्यातही भद्रावती मोहर्ली, जुनोना परिसर हे शेतकऱ्यांवर हल्ले करण्यासाठी वाघांनी दत्तक घेतले की काय, अशी शंका यावी, असा येथील वाघाच्या हल्ल्याचा इतिहास आहे.शर्मिलीचे कुटुंब तुटलेकोलारा गेट परिसर तथा मदनापूर बफर झोन परिसरात वास्तव असलेल्या शर्मिली वाघिणीच्या कुटुंबाने अनेक पर्यटकांना दर्शन देऊन त्यांचे समाधान केले. मात्र तिच्या एक बछड्याने पाच बळी घेतले. त्यामुळे त्याला वनविभाने जेरबंद केल्याने तिचा परिवार तुटून विस्कळीत झाला आहे.परिसरात मानव-वन्यजीव संघर्षताडोबाच्या जंगल क्षेत्राचा विचार करता वाघाची संख्या वाढल्याने हे क्षेत्र कमी पडू लागले आहे. त्यामुळे या गावातील नागरिक व वाघ यांचा संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात या व्यतिरिक्त दुसरे वाघ येऊन शेतकºयांवर हल्ला करू शकतात. तेव्हा आणखी किती वाघांना जेरबंद करणार आणि नागरिकांचे भय कधी संपणार, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :forestजंगल