शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

‘बदली हवी टीम’चे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:12 AM

राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या परिपत्रकान्वये शिक्षक संवर्गाची बदली प्रक्रिया प्रशासनाने तत्काळ राबवावी, या मागणीसाठी ‘बदली हवी टीम’ तर्फे बुधवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात बदलीपात्र जवळपास २०० शिक्षक सहभागी झाले होते.राज्य शासनाने काढलेल्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेची सुरूवात मे २०१७ पासून करण्यात आली. परंतु शासन निर्णयाविरोधात काही शिक्षक न्यायालयात गेले. परंतु त्याच निर्णयानुसारच बदल्या करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळी सुटयानंतर बदली प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही.या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने बदलीपात्र शिक्षकात रोष पसरला आहे. काही शिक्षक या निर्णयाविरोधात असल्याने न्यायालयात जावून खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देणाºया शिक्षकांना २७ फेब्रुवारीचा शासन निर्णय दिलासा देणारा असल्याने या निर्णयानुसारच बदलीप्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.या आंदोलनात बदली हवी टीमचे रवी सोयाम, लखन साखरे, योगेश रामटेके, चांगदेव पाझारे, नरेश बोरिकर, अतुल महाजन आदी शिक्षकांचा सहभाग होता. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ४ ते ९ डिसेंबरला साखळी उपोषण करण्याचा इशारा बदली हवी टीमने दिला आहे.