शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देअंकूर करपण्याचा धोका : धान उत्पादक तालुक्यातील रोवणी लांबणीवर जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्रातील दोन-तीन दिवस वगळल्यास जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाच नाही. मात्र, खरीप हंगाम टळेल या धास्तीने हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पेरणी केली. अंकूर उगवले परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. धान उत्पादक ९० टक्के शेतकऱ्यांनी तर अद्याप पºहेच भरले नाही. त्यामुळे यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.मृग नक्षत्र संपून सोमवारी आद्रा नक्षत्र सुरू झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात सुमारे ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांची वर्तविली आहे. आतापर्यंत पुरेसा पाऊस न पडल्याने शेतातील विहिरी कोरड्या आहेत.अनेक शेतकऱ्यांकडे कृषीपंप असले तरी पाणीच नसल्याने धानाचे पºहे जगवायचे कसे, असा प्रश्न विचारत आहेत. शिवारातील जलस्त्रोतांची पातळी चिंताजनक आहे. शेतीला लागून असलेले नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे यावर्षीचा शेतीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरविणारा असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन उगविलेच नाहीराजुरा, कोरपना, भद्रावती, वरोरा व गोंडपिपरी तालुक्यात सोयाबीन पेरणीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही. त्यामुळे मजूर लावून हाताने टोबणी करीत आहेत. बियाणे न उगविल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाºयांकडे केल्या जात आहेत. कृषी विभागाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी वरोरा व भद्रावती येथील शेतकºयांनी केली.दुबार पेरणीचे संकटखडसंगी : परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन पेरणी केली. धानाचे पºहे टाकले. बियाण्यांना कोंब आले असताना अचानक पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. खडसंगी परिसरामध्ये कोरडवाहू शेती करणाºयांचीच संख्या अधिक आहे. पावसाने साथ दिली तरच शेती अन्यथा कष्टाची माहिती, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.लखमापूर परिसरातील पेरणी रखडलीलखमापूर : कोरपना तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात समाधानकारक ओलावा असेल तरच पेरणी केली जात आहे. यंदा कापूस बियाण्यांची लागवड अधिक प्रमाणात झाली. सोयाबीन लागवड करणारे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर कपाशीचे मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी