शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम खोळंबणार : शेतकऱ्यांना हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित बियाने हरभरा बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकºयांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी बारा वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हरभरा बियाणे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.चिमूर तालुक्यात नेरी, मासळ खडसंगी, भिसी, शंकरपूर परिसर खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन आणि रब्बी पिकासांठी हरभरा,गहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांचा खरिप हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे त्यामुळे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी तयारीला लागला आहे यावर्षी जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. शेतकरी अनुदान तत्वावर हरभरा बियाणे मिळण्याकरिता कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र हंगाम सुरू होऊनही बियाणे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले. जि. प. सदस्य बुटके यांच्या नेतृत्वामध्ये कृषी अधिकारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, विवेक रामटेके, वडशी, विनोद मेश्राम, प्रकाश कुमरे, दिगंबर कामडी, बालाजी कामडी, सुनील कडवे, रत्ना सोनुने, बालाजी वाकडे, बकाराम वाकडे, यशवंत सावसाकडे, विकास वाकडे, मधुकर भोयर, देवनाथ रादये मदनापूर , पांडुरंग वाकडे उपस्थित होते.रब्बी हंगाम वाया जाण्याच्या मार्गावरयंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे. पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना हरभरा बियाणे दिल्याचे समजते. पण, शेकडो शेतकरी वंचित राहिले. दुसऱ्या टप्प्यात बियाणे येणार की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हरभरा बियाणाची वाट बघत आहेत तर काही शेतकऱ्यांना परमिट वाटप करण्यात आले. पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप