शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
4
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
5
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
6
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
7
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
8
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
9
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
11
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
12
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
13
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
14
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
15
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
16
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
17
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
18
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
19
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
20
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 5:00 AM

नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ३० टक्केच उतारी

घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांचे धान पिकावर आक्रमण याचा परिणाम धान पिकाच्या उतारीवर झाला आहे. हातात येत असलेली उतारी पाहून शेतकऱ्यांचे स्वप्न पार चुराडा होत आहे. सरासरीच्या ३० टक्केच उतारी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीत आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे. धानाची कापणी झालेल्या शेतकऱ्यांनी मळणीस सुरूवात केली असून धानाची उतारी पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. सर्वसामान्यपणे एका एकरातून किमान १७ ते २० पोती धानाची उतारी यायला पाहिजे. पण यावर्षी ८ ते ९ पोतीच उतारी येत आसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षा कमी उतारी येत आहे. धान कापणी, बांधणी आणि मळणीस परवडत नाही म्हणून काही शेतकरी धानाची कापणीच न करण्याचा विचार करीत आहेत. या संकटाने तालुक्यातील शेतकरी खचले आहेत. आवते, पऱ्हे भरण्यापासून तर रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणी करेपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी १४ ते १५ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. अशी आपत्ती ओढवली तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज कोणीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही. शेतीचा हंगाम करताना एकतर शासकीय नाही तर खासगी कर्जाची उचल करूनच शेती करावी लागते. आता उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी आणि घरी काय ठेवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. 

मळणीयंत्र मालक बेजारधानाची उतारी लक्षात घेता धानाची मळणी करणारे मशीन मालक चांगलेच वैतागले आहेत. कापणी केलेल्या धानाचे पुंजणे मोठे दिसत असल्या तरी त्यातून निघणारी धानाची पोती अतिशय कमी राहत आहेत. त्यामुळे मशीन आणि मजुरांनाही परवडत नाही. त्यामुळे अनेक मशीन मालकांनी आता पोत्याच्या संख्येनुसार मोबदला घेण्याऐवजी डिबली किंवा एकराच्या हिशेबानुसार मोबदला घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती