शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ३० टक्केच उतारी

घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांचे धान पिकावर आक्रमण याचा परिणाम धान पिकाच्या उतारीवर झाला आहे. हातात येत असलेली उतारी पाहून शेतकऱ्यांचे स्वप्न पार चुराडा होत आहे. सरासरीच्या ३० टक्केच उतारी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीत आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे. धानाची कापणी झालेल्या शेतकऱ्यांनी मळणीस सुरूवात केली असून धानाची उतारी पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. सर्वसामान्यपणे एका एकरातून किमान १७ ते २० पोती धानाची उतारी यायला पाहिजे. पण यावर्षी ८ ते ९ पोतीच उतारी येत आसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षा कमी उतारी येत आहे. धान कापणी, बांधणी आणि मळणीस परवडत नाही म्हणून काही शेतकरी धानाची कापणीच न करण्याचा विचार करीत आहेत. या संकटाने तालुक्यातील शेतकरी खचले आहेत. आवते, पऱ्हे भरण्यापासून तर रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणी करेपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी १४ ते १५ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. अशी आपत्ती ओढवली तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज कोणीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही. शेतीचा हंगाम करताना एकतर शासकीय नाही तर खासगी कर्जाची उचल करूनच शेती करावी लागते. आता उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी आणि घरी काय ठेवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. 

मळणीयंत्र मालक बेजारधानाची उतारी लक्षात घेता धानाची मळणी करणारे मशीन मालक चांगलेच वैतागले आहेत. कापणी केलेल्या धानाचे पुंजणे मोठे दिसत असल्या तरी त्यातून निघणारी धानाची पोती अतिशय कमी राहत आहेत. त्यामुळे मशीन आणि मजुरांनाही परवडत नाही. त्यामुळे अनेक मशीन मालकांनी आता पोत्याच्या संख्येनुसार मोबदला घेण्याऐवजी डिबली किंवा एकराच्या हिशेबानुसार मोबदला घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती