शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ३० टक्केच उतारी

घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांचे धान पिकावर आक्रमण याचा परिणाम धान पिकाच्या उतारीवर झाला आहे. हातात येत असलेली उतारी पाहून शेतकऱ्यांचे स्वप्न पार चुराडा होत आहे. सरासरीच्या ३० टक्केच उतारी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीत आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे. धानाची कापणी झालेल्या शेतकऱ्यांनी मळणीस सुरूवात केली असून धानाची उतारी पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. सर्वसामान्यपणे एका एकरातून किमान १७ ते २० पोती धानाची उतारी यायला पाहिजे. पण यावर्षी ८ ते ९ पोतीच उतारी येत आसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षा कमी उतारी येत आहे. धान कापणी, बांधणी आणि मळणीस परवडत नाही म्हणून काही शेतकरी धानाची कापणीच न करण्याचा विचार करीत आहेत. या संकटाने तालुक्यातील शेतकरी खचले आहेत. आवते, पऱ्हे भरण्यापासून तर रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणी करेपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी १४ ते १५ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. अशी आपत्ती ओढवली तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज कोणीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही. शेतीचा हंगाम करताना एकतर शासकीय नाही तर खासगी कर्जाची उचल करूनच शेती करावी लागते. आता उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी आणि घरी काय ठेवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. 

मळणीयंत्र मालक बेजारधानाची उतारी लक्षात घेता धानाची मळणी करणारे मशीन मालक चांगलेच वैतागले आहेत. कापणी केलेल्या धानाचे पुंजणे मोठे दिसत असल्या तरी त्यातून निघणारी धानाची पोती अतिशय कमी राहत आहेत. त्यामुळे मशीन आणि मजुरांनाही परवडत नाही. त्यामुळे अनेक मशीन मालकांनी आता पोत्याच्या संख्येनुसार मोबदला घेण्याऐवजी डिबली किंवा एकराच्या हिशेबानुसार मोबदला घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती