शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

जि. प. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 5:00 AM

राज्य शासनाच्या कृषी योजनांच्या तुलनेत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजनांची संख्या कमी आहे. बऱ्याच महत्त्वपूर्ण योजना राज्य कृषी विभागाच्या ताब्यात गेल्याने जिल्हा परिषद कृषी विभागातील पदाधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राज्य शासनाने जि. प. कृषी विभागाकडे नाविण्यापूर्ण योजनांचे हस्तांतरण केले नाही.

ठळक मुद्देबजेट अर्ध्यावरच : २५० कोटीमधून ५० टक्क्यांची कपात

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्यामुळे पैशाची जुळवाजुळवा करताना त्यांचे हाल होत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व अल्पभूधारक शेतकºयांना तर पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँका दारावर उभ्याच करत नसल्याचे चित्र आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागाने यंदा एकही नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचे धाडस दाखविले नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निधी कपात धोरणामागे लपण्यातच कृषी विभाग धन्यता मानणार काय, असा प्रश्न समस्याग्रस्त शेतकरी विचारत आहेत.राज्य शासनाच्या कृषी योजनांच्या तुलनेत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजनांची संख्या कमी आहे. बऱ्याच महत्त्वपूर्ण योजना राज्य कृषी विभागाच्या ताब्यात गेल्याने जिल्हा परिषद कृषी विभागातील पदाधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राज्य शासनाने जि. प. कृषी विभागाकडे नाविण्यापूर्ण योजनांचे हस्तांतरण केले नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी केवळ राज्य सरकारच्या कृषी विभागावर भिस्त न ठेवता स्वत:च्या उत्पन्नातून आणि सेस फंडातून नाविण्यपूर्ण योजनांसाठी निधी राखून ठेवला. या निधीतून विविध योजना राबविल्या जात आहे. विशेषत: अल्पभूधारक व अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना कसा लाभ होईल, याचे नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.त्या तुलनेत चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग पिछाडीवर आहे. त्यामुळे दरवर्षी खरीप व खरीप हंगामात रासायनिक खत व बियाणे पुरविणे या दोन योजनांमध्येच कृषी विभाग अडकल्याची नाराजी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.व्यक्तिगत योजना गुंडाळाव्या लागणारसेस फंडातून कीड नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर किटकनाशक, ऑईल इंजिन, विद्युत पंप, पेट्रोडिझेल इंजिन, पीक संरक्षण अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर ताडपत्री व सिंचन पाईप पुरविणे, शेडनेट, कुंपणासाठी तार व खांब सौर कंदील, तुषार सिंचनावर अनुदान यापलिकडे जावून शेतकऱ्यांना बळ देण्याची ही वेळ आहे. मात्र, निधीमध्ये कपात केल्यामुळे शेतकरीहितकारक व व्यक्तिगत लाभांच्या योजनांना याचा फटका बसणार आहे.आदिवासी उपयोजनेवर प्रश्नचिन्हअनुसूचित जमातीसाठी आदिवासी उपयोजना व मागासवर्गीय शेतकºयांना दारिद्रयरेषेवर आणण्यासाठी जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण, शेतीची अवजारे, बैलजोडी, बैलगाडी, इनवेल बोरींग, जुनी विहीर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसेट, तुषारसंच, ठिंबक संच, नवीन विहिरीसाठी अनुदान दिले जाते. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरही काही योजना आहेत. मात्र, यंदा निधी कपातीमुळे या योजनांचे काही खरे नाही.बियाणे, खत पुरवठ्यात आघाडीयंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३३ हजार ११० मेट्रीक टन रासायनिक खत मंजूर करून घेण्यास जि. प. कृषी विभागाने तत्परता दाखविली. ही जमेची बाजू असून जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ८१९ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. सोयाबीन २९ हजार ६३६ कापूस २ हजार ३५३, भात ६ हजार ६१८, तूर १ हजार २२४ असे एकूण ३९ हजार ८३६ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रzpजिल्हा परिषद