शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

पारंपारिक शेतीला फाटा देत माळरानावर फुलविली आंतरपीक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:10 IST

यशकथा : नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाजी यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकऱ्यांना खुणावत आहेत

- शंकर चव्हाण (जिवती, जि. चंद्रपूर)

पारंपरिक शेती करण्याचा कल आता बदलू लागला आहे. नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाजी यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकऱ्यांना खुणावत आहेत. एका सिंमेट फाऊंडेशनच्या बीसीआय प्रकल्पाच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत एका शेतकऱ्याने चक्क पाच एकरांवर लावलेल्या कापूस पिकात कोबी आणि वाल या आंतरपिकाची लागवड करून लाखोंचे उत्पन्न काढले आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा हा प्रयोग या तरुण शेतकऱ्याने यशस्वी केला असून, इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. 

जिवती तालुक्यातील पठारावर वसलेल्या हिमायतनगर येथील तरुण शेतकरी जमीर सय्यद यांनी पाच एकरावर कापूस पिकाची लागवड केली आहे. झाडांचे अंतर कमी करून झाडांची संख्या तर वाढवलीच; शिवाय त्याच कापूस पिकात आंतरपीक म्हणून कोबी आणि वाल या फळभाजीची लागवड केली. यामुळे ६० दिवसांत कोबीचे ८७ हजार रुपयांचे उत्पन्न, तर वालाचे १ लाख ६५ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. मागील दोन वर्षांपासून फाऊंडेशनने जिवती तालुक्यात २००४ पासून सुरू केलेल्या बीसीआय प्रकल्पातून वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व प्रशिक्षण याच भरवशावर सय्यद हे माळरानावर कापूस पिकासोबतच आंतरपिकातून विक्रमी उत्पादन घेत फायदेशीर शेती करण्याकडे वळले आहेत.

वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी जमीर सय्यद या तरुण शेतकऱ्यावर आली होती. अचानक झालेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो पूर्णत: खचला होता. शेतीचे ज्ञान नाही. कुटुंब कसे सांभाळायचे, हा प्रश्नही त्याच्या मनात घर करून बसला होता; परंतु गावातील अनुभवी शेतकऱ्यांची साथ घेतली आणि पारंपरिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. मात्र, निसर्गाची अवकृपाच की, पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नव्हते. त्यावर त्याचा खर्चही अधिक व्हायचा. उरलेल्या पैशातून घरखर्च सांभाळणेही कठीण झाले होते. पीक लागवडीपासून तर पीक हातात येईपर्यंत कर्ज काढूनच शेती करावी लागायची. कर्जातून यंदा तरी सुटका होईल असे वाटायचे; परंतु पावसाने ऐन वेळी दगा दिला की, मनात बाळगलेल्या स्वप्नांचा चुराडा व्हायचा.

अशातच जिवती तालुक्यात बीसीआय प्रकल्पाची सुरुवात करून येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले. या मार्गदर्शनाचा लाभ हिमायतनगरच्या जमीर सय्यद या तरुण शेतकऱ्याला झाला. सय्यद यांनी पारंपरिक पद्धतीने घेत असलेल्या कापूस पिकात बदल करून आंतरपिके घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. उत्पादन क्षेत्र वाढविले. यामध्ये त्याचा आर्थिक फायदा होऊ लागल्याने त्याने हिमायतनगर या पहाडी भागावर कमी दिवसांत हाती येणाऱ्या पिकाची लागवड करून अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. पिकाचे फेरपालट म्हणून एक वेगळा प्रयोग सय्यद यांनी केला. कापूस लागवड केली. यानंतर त्यांनी या पिकातच आंतरपीक घेणे सुरू केले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी