शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक शेतीला फाटा देत माळरानावर फुलविली आंतरपीक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:10 IST

यशकथा : नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाजी यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकऱ्यांना खुणावत आहेत

- शंकर चव्हाण (जिवती, जि. चंद्रपूर)

पारंपरिक शेती करण्याचा कल आता बदलू लागला आहे. नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाजी यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकऱ्यांना खुणावत आहेत. एका सिंमेट फाऊंडेशनच्या बीसीआय प्रकल्पाच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत एका शेतकऱ्याने चक्क पाच एकरांवर लावलेल्या कापूस पिकात कोबी आणि वाल या आंतरपिकाची लागवड करून लाखोंचे उत्पन्न काढले आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा हा प्रयोग या तरुण शेतकऱ्याने यशस्वी केला असून, इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. 

जिवती तालुक्यातील पठारावर वसलेल्या हिमायतनगर येथील तरुण शेतकरी जमीर सय्यद यांनी पाच एकरावर कापूस पिकाची लागवड केली आहे. झाडांचे अंतर कमी करून झाडांची संख्या तर वाढवलीच; शिवाय त्याच कापूस पिकात आंतरपीक म्हणून कोबी आणि वाल या फळभाजीची लागवड केली. यामुळे ६० दिवसांत कोबीचे ८७ हजार रुपयांचे उत्पन्न, तर वालाचे १ लाख ६५ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. मागील दोन वर्षांपासून फाऊंडेशनने जिवती तालुक्यात २००४ पासून सुरू केलेल्या बीसीआय प्रकल्पातून वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व प्रशिक्षण याच भरवशावर सय्यद हे माळरानावर कापूस पिकासोबतच आंतरपिकातून विक्रमी उत्पादन घेत फायदेशीर शेती करण्याकडे वळले आहेत.

वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी जमीर सय्यद या तरुण शेतकऱ्यावर आली होती. अचानक झालेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो पूर्णत: खचला होता. शेतीचे ज्ञान नाही. कुटुंब कसे सांभाळायचे, हा प्रश्नही त्याच्या मनात घर करून बसला होता; परंतु गावातील अनुभवी शेतकऱ्यांची साथ घेतली आणि पारंपरिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. मात्र, निसर्गाची अवकृपाच की, पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नव्हते. त्यावर त्याचा खर्चही अधिक व्हायचा. उरलेल्या पैशातून घरखर्च सांभाळणेही कठीण झाले होते. पीक लागवडीपासून तर पीक हातात येईपर्यंत कर्ज काढूनच शेती करावी लागायची. कर्जातून यंदा तरी सुटका होईल असे वाटायचे; परंतु पावसाने ऐन वेळी दगा दिला की, मनात बाळगलेल्या स्वप्नांचा चुराडा व्हायचा.

अशातच जिवती तालुक्यात बीसीआय प्रकल्पाची सुरुवात करून येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले. या मार्गदर्शनाचा लाभ हिमायतनगरच्या जमीर सय्यद या तरुण शेतकऱ्याला झाला. सय्यद यांनी पारंपरिक पद्धतीने घेत असलेल्या कापूस पिकात बदल करून आंतरपिके घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. उत्पादन क्षेत्र वाढविले. यामध्ये त्याचा आर्थिक फायदा होऊ लागल्याने त्याने हिमायतनगर या पहाडी भागावर कमी दिवसांत हाती येणाऱ्या पिकाची लागवड करून अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. पिकाचे फेरपालट म्हणून एक वेगळा प्रयोग सय्यद यांनी केला. कापूस लागवड केली. यानंतर त्यांनी या पिकातच आंतरपीक घेणे सुरू केले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी