शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवार कृषिपंपांनी बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:23 IST

चंद्रपूर परिमंडळात गेल्या तीन वर्षात तब्बल २४ हजार २३५ नवीन कृषिपंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली आहे. अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप मिळाल्याने त्यांचे शेतही बहरले आहे.

ठळक मुद्देबळीराजाला दिलासा : तीन वर्षांमध्ये २४ हजार २३५ शेतात कृषिपंप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळात गेल्या तीन वर्षात तब्बल २४ हजार २३५ नवीन कृषिपंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली आहे. अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप मिळाल्याने त्यांचे शेतही बहरले आहे.वर्ष २०१४-१५ मध्ये सहा हजार ८५, वर्ष २०१५-१६ मध्ये आठ हजार ४८२, वर्ष २०१६-१७ मध्ये सात हजार ८४४, वर्ष २०१७-१८ या वर्षात एक हजार ३३७ व २०१८-१९ या चालू वर्षात ४८७ अशा एकंदरीत २४ हजार २३५ कृषिपंपधारकांना आतापर्यंत वीजजोडणी मिळाली आहे. यामुळे या शेतकऱ्यांची जमीन आता ओलिताखाली येणार आहे. चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर या तीन विभागात एकंदरीत १२ हजार ४७९ तर गडचिरोली मंडळातील गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरी विभागातील ११ हजार ७५६ कृषिपंपधारकांच्या जीवनात हसू फुलले आहे.एक रोहित्रावरून आता दोन ते तीन कृषिपंपांनाच जोडणीया नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषी पंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही, तो जळणार नाही, आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळाने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.उच्चदाब वितरण तंत्रया तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादित ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. थेट वितरण रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याने वीज हानी रोखण्यास मदत मिळणार आहे. यातून कृषी पंपांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.५० हजार ३६५ कृषिपंपांचे ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेमध्ये विदर्भातील ८०४ कोटीच्या विविध कामांची २३१ पारदर्शक निविदांमार्फ़त आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यात विदर्भातील तब्बल ५० हजार ३६५ कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले असून या योजनेतील कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत, यासाठी उपविभागनिहाय कामांची आखणी करण्यात येऊन त्यानुसारच निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.कृषिपंपांना मिळणार उच्चदाबाचा शाश्वत वीजपुरवठाशेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच ‘हाय व्होल्टेज’ वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतील कामांची आॅनलाईन निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत यापुढे एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. यामुळे सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात सुमारे ८०४ कोटी रुपये मुल्याच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या योजनेसाठी लागणाऱ्या वितरण रोहित्रांची खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुख्यालयाकडून यापुर्वीच सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्व्हेक्षण करण्यात येऊन योजना तयार करण्यात आली. यानुसार महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ योजनेतून जोडणी दिली जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज