शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

एफडीसीएमच्या जंगलात भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:13 IST

वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे.

ठळक मुद्देकन्हारगाव-झरण क्षेत्रातील जंगलाची राख : बांबू, फाटे, इमारती लाकडे जळाली

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग विझविण्यासाठी वनविकास महामंडळाकडे अद्यावत यंत्रणा नाही. काही ठिकाणी आग विझविण्यासाठी आग प्रतिबंधक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, तर काही ठिकाणी आग नियंत्रणासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.कन्हारगाव वनक्षेत्रातील कक्ष क्र. ६७ मध्ये लागलेल्या आगीत बांबू, बांबू बंडल, बिट, फाटे व इमारती लाकूड जळाले. कन्हारगाव, झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र. ५, १७, १३, १०८, १४, ७६, १२४, १२३, ८२, ८१, ६, १३२, ६८, ७२, ७३, १९, १८, १७, १६, १, २, ३ व ६७ मध्ये मोठ्या प्रमाणात वनवा भडकला. यात बांबू, बिट, फाटे, बांबू बंडल, इमारती लाकूड जळाले आहे. मागील वर्षी निष्कासित करण्यात आलेला लांब बांबू व बांबू बंडल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक झाला नाही. तो पूर्णत: जळाला आहे.बल्लारशाह विभागाअंतर्गत झरण कन्हारगाव, तोहोगाव व धाबा वनक्षेत्र असून त्याअंतर्गत ३२ हजार हेक्टरवर मौल्यवान जंगल आहे. या जंगलात दरवर्षी विविध निष्कासनाची कामे केली जातात. त्यातील वनउपजाची वाहतूक विक्री डेपोवर होत नसल्याने वनउपज जळून खाक झाले आहे.कक्ष जळाल्यानंतर त्याचा पीओआर करावा लागतो. मात्र वनरक्षक प्रत्यक्ष जळालेले क्षेत्र न दाखविता, अल्प क्षेत्र दाखवून स्वत:ला संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी जळालेल्या क्षेत्राचे पीओआर केले नसल्याची माहिती आहे. तर काहींनी त्याची सत्य माहिती कारवाईच्या भितीने वनविभागाला दिली नाही. यावर्षी वनव्यात भरपूर जंगल, वनउपज जळला असून त्याची चौकशी होणे आवश्यक असून जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नुकसानजंगलात आग पसरू नये, यासाठी जाळरेषा व पालापाचोळा दहा मिटर अंतरावर जाळण्यात येते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र अधिकारी कामचलावू धोरण अवलंबून दर्शनी भागात कामे करतात व आतील कामे करीत नाही. परिणामी वनवा जंगलभर पसरतो. यात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व खाबुगीरीने जंगलाचे नुकसान होत आहे. आगी लागल्यानंतर ही माहिती जबाबदार वनरक्षक, वनपालांनी आग यंत्रणेला द्यावी लागते. मात्र ती माहिती दडविली जात आहे.