शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एफडीसीएमच्या जंगलात भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:13 IST

वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे.

ठळक मुद्देकन्हारगाव-झरण क्षेत्रातील जंगलाची राख : बांबू, फाटे, इमारती लाकडे जळाली

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग विझविण्यासाठी वनविकास महामंडळाकडे अद्यावत यंत्रणा नाही. काही ठिकाणी आग विझविण्यासाठी आग प्रतिबंधक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, तर काही ठिकाणी आग नियंत्रणासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.कन्हारगाव वनक्षेत्रातील कक्ष क्र. ६७ मध्ये लागलेल्या आगीत बांबू, बांबू बंडल, बिट, फाटे व इमारती लाकूड जळाले. कन्हारगाव, झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र. ५, १७, १३, १०८, १४, ७६, १२४, १२३, ८२, ८१, ६, १३२, ६८, ७२, ७३, १९, १८, १७, १६, १, २, ३ व ६७ मध्ये मोठ्या प्रमाणात वनवा भडकला. यात बांबू, बिट, फाटे, बांबू बंडल, इमारती लाकूड जळाले आहे. मागील वर्षी निष्कासित करण्यात आलेला लांब बांबू व बांबू बंडल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक झाला नाही. तो पूर्णत: जळाला आहे.बल्लारशाह विभागाअंतर्गत झरण कन्हारगाव, तोहोगाव व धाबा वनक्षेत्र असून त्याअंतर्गत ३२ हजार हेक्टरवर मौल्यवान जंगल आहे. या जंगलात दरवर्षी विविध निष्कासनाची कामे केली जातात. त्यातील वनउपजाची वाहतूक विक्री डेपोवर होत नसल्याने वनउपज जळून खाक झाले आहे.कक्ष जळाल्यानंतर त्याचा पीओआर करावा लागतो. मात्र वनरक्षक प्रत्यक्ष जळालेले क्षेत्र न दाखविता, अल्प क्षेत्र दाखवून स्वत:ला संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी जळालेल्या क्षेत्राचे पीओआर केले नसल्याची माहिती आहे. तर काहींनी त्याची सत्य माहिती कारवाईच्या भितीने वनविभागाला दिली नाही. यावर्षी वनव्यात भरपूर जंगल, वनउपज जळला असून त्याची चौकशी होणे आवश्यक असून जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नुकसानजंगलात आग पसरू नये, यासाठी जाळरेषा व पालापाचोळा दहा मिटर अंतरावर जाळण्यात येते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र अधिकारी कामचलावू धोरण अवलंबून दर्शनी भागात कामे करतात व आतील कामे करीत नाही. परिणामी वनवा जंगलभर पसरतो. यात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व खाबुगीरीने जंगलाचे नुकसान होत आहे. आगी लागल्यानंतर ही माहिती जबाबदार वनरक्षक, वनपालांनी आग यंत्रणेला द्यावी लागते. मात्र ती माहिती दडविली जात आहे.