त्या ७८० मजुरांचा वनवास अखेर संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:54+5:30

रोजगाराच्या शोधात हे मजूर आंध्र प्रदेशात गेले होते. लॉकडाऊनमुळे हे मजूर तिथेच अडकले. मागणीनंतर शासन पातळीवर एक धोरण निश्चित करण्यात आले आणि या धोरणानुसार या मजुरांना घेऊन ही विशेष श्रमिक ट्रेन आंध्र प्रदेशातील रायनापाडू या रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी रात्री २ वाजता सोडण्यात आली. नागभीड रेल्वे स्टेशनवर ही विशेष श्रमिक ट्रेन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता पोहचली.

The exile of those 780 workers finally came to an end | त्या ७८० मजुरांचा वनवास अखेर संपला

त्या ७८० मजुरांचा वनवास अखेर संपला

ठळक मुद्देआंध्रात अडकलेल्या मजुरांना घेऊन रेल्वे पोहचली नागभीड स्थानकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : आंध्र प्रदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील ७८० मजुरांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी नागभीड येथे सकाळी ९.३० वाजता पोहचली. लॉकडाऊनच्या दीड महिन्यात अतिशय हालअपेष्टा सहन करीत असलेल्या या मजुरांचा वनवास अखेर संपुष्टात आला. या सर्व मजुरांना महामंडळाच्या व खासगी ३६ बसद्वारे प्रशासनाकडून त्यांच्या गावी पोहचवून देण्यात आले.
रोजगाराच्या शोधात हे मजूर आंध्र प्रदेशात गेले होते. लॉकडाऊनमुळे हे मजूर तिथेच अडकले. मागणीनंतर शासन पातळीवर एक धोरण निश्चित करण्यात आले आणि या धोरणानुसार या मजुरांना घेऊन ही विशेष श्रमिक ट्रेन आंध्र प्रदेशातील रायनापाडू या रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी रात्री २ वाजता सोडण्यात आली. नागभीड रेल्वे स्टेशनवर ही विशेष श्रमिक ट्रेन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता पोहचली. त्याअगोदरच संपूर्ण प्रशासन वैद्यकीय सेवेसह सज्ज होते. सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली.

Web Title: The exile of those 780 workers finally came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.