शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

व्यवसायासाठी सर्वांनी मिळून एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

चंद्रपूर : एक माणूस जर व्यवसाय उभारू शकत नसेल, तर पाच-पंचवीस लोकांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारावे. इतर समाजाचे लोक ...

चंद्रपूर : एक माणूस जर व्यवसाय उभारू शकत नसेल, तर पाच-पंचवीस लोकांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारावे. इतर समाजाचे लोक एकत्र येऊन व्यवसाय करतात. मात्र, कुणबी समाजात हे दिसून येत नाही. त्यामुळे बदलत्या काळानुसार सर्वांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारावे. जेणेकरून समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारेल व समाज पुन्हा मोठ्या संख्येने संघटित होईल, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय त्रीदिवसीय ऑनलाइन उपवधू-वर परिचय मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी कुणबी समाज मंदिर येथे आयोजित सत्रात खासदार बाळू धानोरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर मालेकर, प्रमोद काकडे, विवेक खुटेमाटे, प्रभाकर दिवसे, अरविंद मुसळे, अनिल वाग्दरकर, मनोहर पाऊणकर, सुधाकर अडबाले, प्रा. विजय बदखल, अतुल देऊळकर, सतीश मालेकर, अरुण मालेकर, विनोद पिंपळशेंडे, प्रा. रवींद्र झाडे आदींची उपस्थिती होती.

खासदार धानोरकर यांनी समाज चालविण्यासाठी संघटन आवश्यक आहे. संघटनेतूनच समाजहिताची कामे होतात. शिवाय एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजासाठी कार्य करण्याचे मत मांडले. महिला सक्षमीकरण, शेतक-यांच्या विषयांवरही त्यांनी मत मांडले. तसेच कुणबी समाज मंडळासाठी रुग्णवाहिका आपल्या निधीतून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झालीत. निवडक उपवर-उपवधुंचा परिचय मेळावा पार पडला. या ऑनलाइन मेळाव्यासाठी विजय मुसळे यांचे विशेष योगदान लाभत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेस विशेष सहकार्य केल्याबद्दल श्रद्धा सपाट यांचा सत्कार करण्यात आला.

संचालन प्रा. नामदेव मोरे, प्रा. अनिल डहाके, अस्मिता गौरकार यांनी केले. आभार विलास माथनकर यांनी मानले.