शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:05 IST

मनरेगाचा भोंगळ कारभार : गुरांसाठी बांधले गोठे; निधी केव्हा देणार?

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गाय पालन योजनेअंतर्गत गाईचा गोठा बांधकामासाठी शासनस्तरावरून अनुदान मिळणार म्हणून पशुपालकांनी, दोन ते सहा गुरे असणाऱ्यानी दोन वर्षांपूर्वी गुरांसाठी गोठा मंजूर करून संपूर्ण बांधकाम केले; परंतु दोन वर्षांचा काल लोटून देखील गोठ्याचे पैसे मिळाले नाहीत. आता तुम्हीच सांगा साहेब, आम्हाला पैसे कधी मिळणार? अशी विचारणा लाभार्थी करीत आहेत.

दिवसेंदिवस शेती परवडत नसल्याने शासन म्हणते शेतीपूरक व्यवसाय करा. शेतीपूरक व्यवसाय केला तर त्याला शासनाकडून पैसे मिळत नसल्याचे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे. काही युवकांनी शासनाच्या दुधाळ जनावरांच्या योजनेचा लाभ घेत दुधाळ जनावरे घेतली. त्यांना बांधण्यासाठी निवारा नसल्यामुळे पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेल्या मनरेगाच्या माध्यमातून पळसगाव येथील लाभार्थी यादव धोंगडे यांनी गोठा मंदिर करून त्याची बांधणीसुद्धा केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये काही पीक नसल्यामुळे कर्जाची उचल करून त्या संपूर्ण गोठ्याचे बांधकाम केले. बांधकाम केल्याबरोबरच अनुदान मिळेल या आशेने संपूर्ण गोठ्याचे काम तत्काळ केले; पण दोन वर्षांचा काळ लोटून देखील संपूर्ण पैशाचा परतावा अद्यापही झालेला नाही. कार्यालयाच्या चकरा मारूनही अनुदानाचे पैसे मिळत नसल्याचे लाभार्थी त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत असे लाभार्थी आहेत, ज्यांनी या योजनेअंतर्गत स्वखर्चाने गोठ्याचे बांधकाम केले. मात्र, अनुदान मिळाले नाही. 'सरकारी काम अन् दोन वर्षे थांब' अशी अवस्था लाभार्थ्यांची झाली आहे. गोठ्याच्या अनुदानाचे पैसे जर मिळत नसेल तर शासनाने ही योजना राबवू नये. जेणेकरून संबंधित लाभार्थ्यांना नाहक त्रास होणार नाही. असे लाभार्थीकडून बोलले जात आहे. संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तत्काळ लाभार्थ्यांचे अनुदान खात्यात वर्ग करावे, अशी मागणी होत आहे.

जोडधंद्याला चालना देण्यासाठी अनुदान देणे आवश्यकएकीकडे शेतीला जोडधंदा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून योजना राबवल्या जातात. त्यात युवा शेतकरी दूध व्यवसायात पाऊल टाकल्यानंतर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा करतात. शासकीय योजनांचा आधार घेऊन गोठ्याचे बांधकाम केल्यानंतरही दोन वर्षे वाट पाहावी लागत असल्याने कुठेतरी योजनेत पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गोठा बांधून दोन वर्षे झाल्यानंतरही पैसे मिळत नसेल तर या संपूर्ण योजना बंद केल्या तरी चालेल, असेल लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे.

"गुरांचा गोठा बांधकाम करून दोन वर्षांचा काळ लोटला आहे. फक्त नऊ हजार रुपये संबंधितांकडून प्राप्त झाले आहेत; पण उर्वरित रक्कम अद्यापही दोन वर्षांपासून रखडली आहे. अनुदानाची वेळेत परतफेड होत नसल्याने पुढे एकही लाभार्थी गुरांच्या गोठ्याचा लाभ घेणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे." - ठकसेन धोंगडे, लाभार्थ्यांचा मुलगा

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर