शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

२५ वर्षे उलटूनही शेतीक्षेत्र तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST

रत्नाकर चटप नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पकडगुड्डम धरण बांधून २५ वर्षे उलटली. मात्र, धरणाचे खोलीकरण अद्यापही झालेली ...

रत्नाकर चटप

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पकडगुड्डम धरण बांधून २५ वर्षे उलटली. मात्र, धरणाचे खोलीकरण अद्यापही झालेली नाही. त्यामुळे पायथ्याच्या लगतची शेती सिंचनापासून वंचित असलेली दिसून येत आहे.

जवळपास ११.७ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले हे धरण १६४ हेक्टर क्षेत्रावर आहे. टेकड भाग असल्याने धरणात प्रत्यक्षात १०० हेक्टर क्षेत्रावरच पाणी साचलेले दिसून येते. धरणातील मुख्य कालव्याचे काम वगळता इतर लघु कालवे आजही स्वच्छ करण्यात आलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या कालव्यामध्ये आता झुडपे वाढलेली असून, जागोजागी मातीचे ढिगारे साचलेले दिसून येत आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या इंजापूर, खैरगाव, सोनुरली, चिंचोली, पारंबा, दहेगाव, खिर्डी, पिपर्डा, लोणी, वडगाव, वनसडी आदी गावांसाठी शेतीला सिंचनाचे पाणी दिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक गावांना आजपर्यंत पाणी पोहोचलेले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

साधारणपणे ३२४४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली असल्याचे कागदोपत्री दिसते. यातच २००४ पासून अंबुजा सिमेंट कंपनीला तीन दशलक्ष घनमीटर इतके पिण्याचे पाणी या धरणातून नियमित दिले जात आहे. त्यामुळे १२६४ दशलक्ष घनमीटर शेतीक्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलेले आहे. ११ लाख रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वी आच्छादन तयार करण्यात आले. मात्र, इतर कामे अद्यापही सिंचन विभागाने केलेली नाहीत. कोरपना तालुक्यातील अंमलनाला व पकडीगड्डम धरण शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी बांधण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी याचा लाभ होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन आजही सिंचनापासून वंचित आहे. आता खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.

बॉक्स

रब्बी हंगामात पाण्याची मोठी गरज

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याची गरज पडते. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होताना दिसते. धरणाच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. कोरपना तालुक्यात तीन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कापसाचा पेरा आहे. यातच सोयाबीन पिकानंतर रब्बी हंगामात गहू, हरभरा यासारखी पिके घेतली जातात. कापूस हे प्रमुख पीक असल्याने या पिकासाठी पाण्याची मोठी गरज असते. तेव्हा धरणाची खोली करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

कोट

रब्बी हंगामाकरिता कालव्याचे खोलीकरण करणे व स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असून, धरणाचे खोलीकरण करून स्वच्छता करण्याची मागणी मी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

-सय्यद आबीद अली, संस्थापक अध्यक्ष जनसत्याग्रह संघटना, कोरपना