शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षे उलटूनही शेतीक्षेत्र तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST

रत्नाकर चटप नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पकडगुड्डम धरण बांधून २५ वर्षे उलटली. मात्र, धरणाचे खोलीकरण अद्यापही झालेली ...

रत्नाकर चटप

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पकडगुड्डम धरण बांधून २५ वर्षे उलटली. मात्र, धरणाचे खोलीकरण अद्यापही झालेली नाही. त्यामुळे पायथ्याच्या लगतची शेती सिंचनापासून वंचित असलेली दिसून येत आहे.

जवळपास ११.७ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले हे धरण १६४ हेक्टर क्षेत्रावर आहे. टेकड भाग असल्याने धरणात प्रत्यक्षात १०० हेक्टर क्षेत्रावरच पाणी साचलेले दिसून येते. धरणातील मुख्य कालव्याचे काम वगळता इतर लघु कालवे आजही स्वच्छ करण्यात आलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या कालव्यामध्ये आता झुडपे वाढलेली असून, जागोजागी मातीचे ढिगारे साचलेले दिसून येत आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या इंजापूर, खैरगाव, सोनुरली, चिंचोली, पारंबा, दहेगाव, खिर्डी, पिपर्डा, लोणी, वडगाव, वनसडी आदी गावांसाठी शेतीला सिंचनाचे पाणी दिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक गावांना आजपर्यंत पाणी पोहोचलेले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

साधारणपणे ३२४४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली असल्याचे कागदोपत्री दिसते. यातच २००४ पासून अंबुजा सिमेंट कंपनीला तीन दशलक्ष घनमीटर इतके पिण्याचे पाणी या धरणातून नियमित दिले जात आहे. त्यामुळे १२६४ दशलक्ष घनमीटर शेतीक्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलेले आहे. ११ लाख रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वी आच्छादन तयार करण्यात आले. मात्र, इतर कामे अद्यापही सिंचन विभागाने केलेली नाहीत. कोरपना तालुक्यातील अंमलनाला व पकडीगड्डम धरण शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी बांधण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी याचा लाभ होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन आजही सिंचनापासून वंचित आहे. आता खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.

बॉक्स

रब्बी हंगामात पाण्याची मोठी गरज

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याची गरज पडते. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होताना दिसते. धरणाच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. कोरपना तालुक्यात तीन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कापसाचा पेरा आहे. यातच सोयाबीन पिकानंतर रब्बी हंगामात गहू, हरभरा यासारखी पिके घेतली जातात. कापूस हे प्रमुख पीक असल्याने या पिकासाठी पाण्याची मोठी गरज असते. तेव्हा धरणाची खोली करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

कोट

रब्बी हंगामाकरिता कालव्याचे खोलीकरण करणे व स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असून, धरणाचे खोलीकरण करून स्वच्छता करण्याची मागणी मी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

-सय्यद आबीद अली, संस्थापक अध्यक्ष जनसत्याग्रह संघटना, कोरपना