शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

माना कॉलरीचे पाणी वर्धा नदीत सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:20 IST

यंदा पाऊस कमी झाल्याने वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही. याचा फटका या उन्हाळ्यात बसणे सुरू झाले आहे. पाणी वापरावर मर्यादा आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे आता शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपेपरमिलचे सहकार्य : बल्लारपुरात एक दिवसाआड पाणी

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : यंदा पाऊस कमी झाल्याने वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही. याचा फटका या उन्हाळ्यात बसणे सुरू झाले आहे. पाणी वापरावर मर्यादा आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे आता शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुढे पाण्याची तीव्र टंचाई भासू नये, याकरिता मजिप्रा, नगर परिषद प्रशासन, बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापन यांनी एकत्रित येऊन युद्धपातळीवर उपाययोजनावर काम सुरू केले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बल्लारपूर शहरात प्रतिदिन १० एमएलडी एवढा पाणी पुरवठा होत असते. ही उचल वर्धा नदीवरून होते. याच नदीवर राजुरा, पेपर मिल यांच्या विहिरी असून पेपरमिल तर रोज ४७ एमएलडी एवढे पाणी उचलते. या तीनही विभागांनी नदीवर बंधारे बांधले आहेत.नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागल्यामुळे मजिप्राने जुना बंधारा अधिक उंच आणि मजबुतीकरिता नगर परिषदेचे अर्थसहाय्य घेतले. तरीही पाण्याची पातळी समाधानकारक नाही. पुढे पाण्याची भीषण टंचाई होऊ नये, याकरिता उपाय योजनाबाबत न. प., जीवन प्राधिकरण, पेपरमिल, तहसील कार्यालय यांची तातडीची बैठक झाली. त्यात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुदधा, जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील, तहसीलदार विकास अहीर, पेपर मिलचे काशीकर यांनी भाग घेऊन चर्चेअंती, चंद्रपूर जवळील माना कोळसा खाणीतून उसर्ग होणारे पाणी वर्धा नदीत आणण्याचे ठरले व याची सर्व जबाबदारी पेपरमिल व्यवस्थापनाने उचलली आहे. त्यानुसार माना खदानीत तीन पंप लावून इरई नदी वाटेने वर्धा नदीत पाणी येत आहे. एक दोन दिवसात आणखी दोन पंप लावले जाणार आहेत, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे तूर्त पाणी टंचाईवर मात करता आली आहे. तरीही, रोजच्या कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी खालावून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. तशा आणीबाणीप्रसंगी पेपरमिलचे पाणी प्राधिकरणाकडे वळविण्याकरिता आतापासूनच तयारी करून ठेवण्यात आली आहे. पाण्याच्या रोजच्या स्थितीकडे जीवन प्राधिकरणाकडून पाहणी केली जात आहे.तोटी चोरांमुळे मौल्यवान पाणी वायासार्वजनिक नळाच्या तोट्या चोरीला जात असल्याने पाणी विनाकारण वाया जात आहे. यावर उपाय म्हणून नगर परिषदेने तोट्या पाईपला वेल्डिंग केल्या. त्यावर उपाय म्हणून चोरांनी पाईप कापून तोट्या चोरून नेल्या. त्यामुळे, परत पूर्वस्थिती आली. रोज कितीतरी पाणी वाया चालले आहे. नगर परिषद परत तोट्यांना वेल्डिंग करीत आहे. तोट्या बसविणे, चोरांनी चोरून नेणे व मौल्यवान पाणी वाया जाणे हे चक्र पूर्णत: कसे व कधी थांबणार. चोरांना पकडून कडक शिक्षा झाल्यशिवाय ते थांबणार नाही.आठ हजार कनेक्शनबल्लारपूर शहरात मजिप्राचे ८ हजार घरी नळ कनेक्शन, ३५० स्टँड पोस्ट (सार्वजनिक नळ) आहेत. जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर शहरातील सुमारे ६० हजार लोकांची तहान भागत आहे. रेल्वे कॉलनीलाही येथूनच पाणी दिले जाते.पाणी एक दिवसाआड दिले जात असले तरी, ते साठवून ठेवल्यास दोन तीन दिवस सहज पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. एक दिवस वस्ती विभाग आणि एक दिवस टेकडी विभाग अशी विभागणी केली आहे.- सुशील पाटील,उपविभागीय अभियंतानगर परिषदेच्या ५० विहिरी आहेत. ५१० हातपंप, बोअरिंग, ५२ इंधन विहीर (ट्यूब वेल) स्वच्छ केल्या आहेत. टँकरने पाणी पुरवठा करण्याची अजून स्थिती आली नाही. मात्र, वेळ आलीच तर तशी तयारी करून ठेवण्यात आली आहे.- स्वप्नील पिदुरकर, अभियंता,न. प. पाणी पुरवठा.