शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:40 AM

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.

ठळक मुद्देगावरान आंब्यांची मागणी वाढली : आंब्यांसाठी यंदा पोषक हवामान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. मग त्या कैऱ्या असोत की परिपक्व. पिकलेले आंबे तर प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. आंबे हवेहवेसे वाटत असले तरी झाड लावण्याची कुणी तसदी घेत नाही. त्यामुळे हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आंब्यांच्या झाडांची लागवड करून त्याला व्यावसायिक पद्धतीने संगोपण केले. त्यामुळे गावरान आंब्यांचे गाव म्हणून डोगरगावची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.सध्या तप्त उन्हाळा सुरू आहे. अंगाची लाहीलाही होत असताना गावरान आंबा चाखल्यास मोठा आनंद मिळतो. डोंगरगाव हे गाव शहरापासून पाच किमी अंतरावर आहे. गावातील सर्वच नागरिक शेती करतात. येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. धानासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. परंतु, मागील काही वर्षात डोंगरगाव हे दर्जेदार गावरान आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोडे व अजय हिरामन कोसे आदींनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. याशिवाय गावरान आंब्यांची झाडेही शेतात आहेत. या शेतकºयांकडे सुमारे १५० झाडे असल्याची माहिती पुढे आली. उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की, बाजारात केव्हा येतात, याची प्रतीक्षा शहरातील नागरिकांना लागून असते.आंबा पाडाला आल्यानंतर आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील, याची सूचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात खपत असतात. बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात. शेतकºयांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नगदी पिकांचा स्वीकार केला. यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे.

टॅग्स :Mangoआंबा