अकाली पावसामुळे झाडावरचा कापूस जमिनीवर

By Admin | Updated: March 7, 2016 00:39 IST2016-03-07T00:39:14+5:302016-03-07T00:39:14+5:30

सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे.

Due to untimely rains, the plant's cotton soil | अकाली पावसामुळे झाडावरचा कापूस जमिनीवर

अकाली पावसामुळे झाडावरचा कापूस जमिनीवर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा : मजुरी वाढल्याने ठेवला होता कापूस
आशिष देरकर गडचांदूर
सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे. अकाली पावसामुळे शेकडो हेक्टरमधील कापूस पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचा जीव रडकुंडी आला आहे. या संकटाची झळ कापसासह अनेक पिकांना बसली आहे.

कोरपना तालुक्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती होती. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आणेवारीत तालुका बसत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. अशातच कापसाचा शेवटचा वेचा शिल्लक होता. त्यातून कसेबसे सावरले असते. मात्र निसर्गाला ते मान्य नव्हते. शेतकऱ्यांच्या शेवटच्या कापसावर अकाली पावसाने दरोडा टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा शिल्लक होता. मजुरांच्या कमतरतेमुळे व मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कापूस वेचण्यात अडचणी येत होत्या. सध्या शेती हंगाम संपत आल्याने काही गरीब कास्तकारांनी मजुरी न देता हळूहळू घरच्याच लोकांच्या माध्यमातून कापूस वेचणी सुरु केली होती. जेनेकरुन बाहेरील मजुरांना मजुरी द्यावी लागणार नाही. पण अकाली पावसामुळे शेतकऱ्यांची ही शक्कल अपयशी ठरली. शेकडो हेक्टरमधील शेती पांढऱ्या सोन्याने फुललेली होती. मात्र अकाली पावसाने जमीन पांढरी झाली आहे.
कोरपना तालुक्यातील कोरपनासह गडचांदूर, नांदा, बिबी,आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, बाखर्डी, निमणी, पालगाव, हिरापूर, सांगोडा, लोणी, पिपरी, गाडेगाव, विरुर राजुरगुडा, नैतामगुडा, पिंपळगाव,, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, कढोली, अंतरगाव, बोरी, नवेगाव, पिपर्डा, परसोडा, कोडशी, कोडशी (बु.), नांदगाव, जैतापूर, धोपटाळा, रामपूर, कुकुडसात यांसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत.
यावर्षी कापसाला चार हजार रुपयापर्यंत भाव देण्यात आला. मात्र मिळकतीपेक्षा खर्च जास्त अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. एकतर कापसाला भाव कमी आणि वेचणीची मजुरी महाग व अकाली पावसाची हजेरी अशा तिहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. शासनाकडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरसकट मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार द्या : सुभाष धोटे
अकाली पावसामुळे फक्त कोरपना तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. शासनाने तातडीने सर्वेक्षण करुन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानगस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत करावी व चंद्रपूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.

Web Title: Due to untimely rains, the plant's cotton soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.