शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मार्गावरील धुळीने पिके काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:06 AM

उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामूळे शेतातील उभ्या पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने धुळीने काळवंडत आहे.

ठळक मुद्देढिसाळ नियोजनाचा फटका : शेकडो शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

आशिष गजभिये ।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामूळे शेतातील उभ्या पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने धुळीने काळवंडत आहे. यातून मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रं.३५३ (ई) मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याकरिता चिमूर- वरोरा मार्ग संबधित कंपनीने पूर्णत: खोदला आहे. हे काम कासवगतीने सुरु आहे. वाहतुकीकरिता याठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आते. बांधकाम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये, याकरिता संबंधित मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा केला जात आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. मार्गालगत बहुतांश शेतकरी कपाशीचे पीक घेतात. परंतु, धुळीवर पाणी मारल्या जात नाही. ही धुळ पिकांवर बसत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. खडसंगी परिसरातील वहानगाव व बोथली गावातील शेतकºयांच्या शेताचे कंत्राटदाराच्या चुकीमुळे उभी पिके काळवंडली.शेतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुळीचे थर बसले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. शिवाय, विविध रोगांच्या प्रादुर्भामुळे कापसाचे उत्पादन अत्यल्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. लागवडीचा खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकरी विचात आहेत.दुष्काळग्रस्त चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था तर अधिकच बिकट दिसत आहे. कमी प्रमाणात लागलेली कापसाची बोंडे काळवंडली आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण करताना मार्गावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कापसाची प्रत खराब झाली. कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.पावसाळ्यादरम्यान महामार्गाच्या कामाने परिसरातील वहानगाव व बोथली येथील शेतकºयांच्या शेतात पाणी शिरले होते. यातही मोठे नुकसान झाले. चौपदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत.नुकसान भरपाईची मागणीकंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे महामार्गालगतच्या पिकांवर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील वरोरा- चिमूर मार्गावरील विविध गावांच्या शेतकºयांनी केली आहे.अपघातांचे सत्र सुरूचमार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम एक वर्षापासून सुरू आहे. पर्यायी मार्गाची डागडुजी होत नसल्याने अपघातांचे प्रणाम वाढले आहे. या मार्गावर गिट्टी व मुरूमाचे ठिकठिकाणी ढिगारे टाकल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती