शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झाले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:11 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर स्वागताध्यक्ष म्हणून पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देस्मृतींना उजाळा : २० मे १९६९ रोजी झाले होते अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर स्वागताध्यक्ष म्हणून पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व मान्यवर उपस्थित होते.मे महिण्याच्या मध्यानंतरचे नवतपाचे पर्व चंद्रपुरातील पुरोगामी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना अजुनही ज्ञात आहे. इंदिरा गांधी यांचे दुपारी रणरणत्या उन्हात आगमन झाले होते. कस्तुरबा मार्गे गांधी चौकातून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्या. कारमधून उतरण्याची त्यांची चपळाई आणि क्षणात पुतळ्याजवळ पोहोचून अनावरण करणे हा क्षण डोळ्यात साठविणारे शेकडो नागरिक शहरात आहेत. पुतळा अनावरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीक्षा मैदानावर जाहीर सभा झाली. देशातील बौद्ध व पददलितांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्या सोडविल्याच पाहिजे, असा निर्धार त्यांनी भाषणातून व्यक्त केला. त्यांचे ३० मिनीटांचे भाषण लक्षवेधी ठरले. कार्यक्रमानंतर त्या हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना झाल्या.३५ हजारांत तयार झाला स्फूर्तीदायी पुतळाबॅरि. राजाभाऊंच्या देखरेखेखाली पेडेस्टल उभारण्यात येवून त्यावर पुतळा चढविण्यात आला. हा पेडेस्टल गिरीशबाबू खोब्रागडे यांनी तयार केला. ते सिव्हील इंजिनिअर होते. या पुतळ्याची किंमत ३५ हजार होती. अत्यंत माफक दरात शिल्पकार वाघ यांनी चंद्रपूरकरांना हा पुतळा तयार करून दिला. येथे जनता महाविद्यालयाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. शहरात तेव्हा हेच एकमेव कॉलेज होते. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे मोठ्या संख्येने शिक्षण घेत होते. त्यांनी पुतळ्यासाठी आर्थिक मदत केली. या स्फुर्तीदायी पुतळ्याला आज ५० वर्षे पूर्ण झाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जागतिक कीर्तीचे मुंबई येथील शिल्पकार वाघ यांनी तयार केला. ते इंदिरा गांधी यांचे चाहते आणि बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे मित्र होते. सतत तीन दिवस त्यांचा चंद्रपूरात मुक्काम होता. दिल्ली येथे उभारलेल्या बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्यासारखाच चंद्रपुरातील हा ब्रॉंझचा पुतळा तयार केल्याची आठवण ते अभिमानाने सभा संमेलनातून सांगायचे. हा इतिहास नवीन पिढीला कळला पाहिजे.-अ‍ॅड. व्ही. डी. मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर