शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झाले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:11 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर स्वागताध्यक्ष म्हणून पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देस्मृतींना उजाळा : २० मे १९६९ रोजी झाले होते अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक तर स्वागताध्यक्ष म्हणून पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे व मान्यवर उपस्थित होते.मे महिण्याच्या मध्यानंतरचे नवतपाचे पर्व चंद्रपुरातील पुरोगामी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना अजुनही ज्ञात आहे. इंदिरा गांधी यांचे दुपारी रणरणत्या उन्हात आगमन झाले होते. कस्तुरबा मार्गे गांधी चौकातून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्या. कारमधून उतरण्याची त्यांची चपळाई आणि क्षणात पुतळ्याजवळ पोहोचून अनावरण करणे हा क्षण डोळ्यात साठविणारे शेकडो नागरिक शहरात आहेत. पुतळा अनावरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीक्षा मैदानावर जाहीर सभा झाली. देशातील बौद्ध व पददलितांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्या सोडविल्याच पाहिजे, असा निर्धार त्यांनी भाषणातून व्यक्त केला. त्यांचे ३० मिनीटांचे भाषण लक्षवेधी ठरले. कार्यक्रमानंतर त्या हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना झाल्या.३५ हजारांत तयार झाला स्फूर्तीदायी पुतळाबॅरि. राजाभाऊंच्या देखरेखेखाली पेडेस्टल उभारण्यात येवून त्यावर पुतळा चढविण्यात आला. हा पेडेस्टल गिरीशबाबू खोब्रागडे यांनी तयार केला. ते सिव्हील इंजिनिअर होते. या पुतळ्याची किंमत ३५ हजार होती. अत्यंत माफक दरात शिल्पकार वाघ यांनी चंद्रपूरकरांना हा पुतळा तयार करून दिला. येथे जनता महाविद्यालयाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. शहरात तेव्हा हेच एकमेव कॉलेज होते. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे मोठ्या संख्येने शिक्षण घेत होते. त्यांनी पुतळ्यासाठी आर्थिक मदत केली. या स्फुर्तीदायी पुतळ्याला आज ५० वर्षे पूर्ण झाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जागतिक कीर्तीचे मुंबई येथील शिल्पकार वाघ यांनी तयार केला. ते इंदिरा गांधी यांचे चाहते आणि बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे मित्र होते. सतत तीन दिवस त्यांचा चंद्रपूरात मुक्काम होता. दिल्ली येथे उभारलेल्या बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्यासारखाच चंद्रपुरातील हा ब्रॉंझचा पुतळा तयार केल्याची आठवण ते अभिमानाने सभा संमेलनातून सांगायचे. हा इतिहास नवीन पिढीला कळला पाहिजे.-अ‍ॅड. व्ही. डी. मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर