शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अनुसूचित जातीचे घर नसलेल्या फुलझरीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी

By परिमल डोहणे | Updated: April 17, 2023 11:45 IST

मूल्यांसाठी एकत्र आले गाव : कुणीही कामावर न जाता सोहळा साजरा

चंद्रपूर : ‘जिवाला जिवाचे दान दिले भीमाने, माणसाला माणूसपण दिले भीमाने...’ सोनू निगम यांनी गायलेल्या या गीताप्रमाणे आम्हाला खरी ओळख बाबासाहेबांमुळेच मिळाली. आतापर्यंत आम्हाला बाबासाहेब कळू दिले नाहीत. तसेच येणाऱ्या पिढीला बाबासाहेब कळावे, या दृष्टीकोनातून मूल तालुक्यातील फुलझरी या छोट्याशा खेड्यात संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे या गावात अनुसूचित जातीचे एकही घर नाही. तरीसुद्धा दिवसभर विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. छोटेसे खेडे असणाऱ्या फुलझरी येथील गावकऱ्यांचा हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.

अडीचशे लोकसंख्या असलेले फुलझरी हे छोटेसे गाव. गावाची विशेषत: म्हणजे गावात अनुसूचित जातीचे एकही घर नाही. गावातील सर्वच ग्रामस्थ गुण्यागोंविदाने राहतात. गावात काही सुशिक्षितांनी शिवसूर्य युवा ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपतर्फे महान थोर पुरुषांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याच जनजागृतीतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी संपूर्ण गावकरी प्रेरित झाले. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला कळावेत, या उद्देशाने यावर्षीपासून गावात भीमजयंती साजरी करण्याचा ठराव केला. संपूर्ण गावाची सजावट करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण, प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम घेत डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमासाठी शिवसूर्य युवा ग्रुपचे मार्गदर्शक सुभाष बोरुले, अंकुश कस्तुरे, हरिदास ढोले, जितू बोरुले, रमेश ढोले, आकाश शेंडे, सुधीर बोरुले यांच्यासह गावकऱ्यांनी प्रयत्न केले.

कामावर न जाण्याचा ठराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ‘कामावर कुणीही जाणार नाही, सर्व जण जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहतील’ असा ठरावच सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत केला. सायंकाळी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत भव्य मिरवणूक काढली. त्यानंतर गावातील चौकात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन व त्यानंतर गावातील मुलांसाठी बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संपूर्ण गावाची सजावट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण गावाची सजावट करण्यात आली. गावातील चौकात निळे व पंचशील तोरण लावून सजावट करण्यात आली. प्रत्येकाच्या अंगणात रांगोळी काढण्यात आली. लहान-थोरांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व जण या जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते.

सर्व थोर पुरुषांचे विचार अंगीकारणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. त्यामुळे यावर्षीपासून फुलझरी गावात डॉ. आंबेडकर जयंती, म. फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवून त्यांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्याचा ठराव या गावातील ग्रामस्थांनी केला आहे.

आम्हाला आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळू दिले नाहीत. मात्र, आता ते आम्हाला कळायला लागले आहेत. आमच्या पुढील पिढीला बाबासाहेब कळावेत, या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आता दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करणार आहोत.

- सुभाष बोरुले, मार्गदर्शक, शिवसूर्य युवा ग्रुप, फुलझरी.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती