शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कालव्याचे पाणी नको, शेती परत करा

By admin | Updated: November 6, 2014 22:52 IST

कालव्याकरीता शेती देण्यात आली. त्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानही मिळाले नसताना कालवे तयार झाले. परंतु अनेक गावात २० वर्षांपासून पाणी पोहचले नाही. त्यामुळे आमच्या शेत जमीनी

ठिय्या आंदोलन : शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांसमोर आक्रोशवरोरा : कालव्याकरीता शेती देण्यात आली. त्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानही मिळाले नसताना कालवे तयार झाले. परंतु अनेक गावात २० वर्षांपासून पाणी पोहचले नाही. त्यामुळे आमच्या शेत जमीनी आम्हाला परत करा, कालव्याचे पाणीही नको म्हणत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासमोर चांगलाच आक्रोश केल्याने वातावरण धिरगंभीर झाले. लाल पोथरा कालव्यातील पाणी वरोरा तालुक्याच्या २७ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरीता मिळत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, मागील २० वर्षांपासून शेवटच्या टोकावरील गावापर्यंत आजही पाणी पोहचलेले नाही. यावर्षी रब्बी पिकांना पाणी सोडण्यात यावे, याकरीता लाल पोथरा कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी पाटबंंधारे विभागाच्या वरोरा कार्यालयासमोर मागील पाच दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेण्याकरीता पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शेख व कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी ५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी कालव्याचा काम किती निकृष्ठ दर्जाचे आहे. शेवटच्या टोकापर्यंत आजही पाणी पोहचले नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत नाही. पाणी वाटप समित्या कागदोपत्री तयार करण्यात आल्या अशा एक ना अनेक तक्रारीचा पाण वाचत शेतकऱ्यांनी संतप्त भावना अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. त्यामुळे तक्रारीचा पाढा ऐकून पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी चांगलेच अवाक झाले होते. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश देत येत्या काही दिवसात अंमलबजावणी करुन अहवाल देण्याचे निर्देशही दिले. त्यानंतर पाणी वाटप संदर्भात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.राज्यात रब्बी हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाल्याचे शासनाने घोषीत केले आहे. मात्र, १५ नोव्हेंबर पूर्वी कालव्यातून पाणी सोडता येत नाही, अशी अडचण अधिकाऱ्यांनी मांडताच अधीक्षक अभियंता शेख यांनी शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याकरीता वरोरा परिसराच्या कालव्यातील पाणी १५ नोव्हेंबरपासून सोडणार असल्याचे जाहिर केले.लाल व पोथरा या वर्धा जिल्ह्यातील धरणामधून पाणी वाटप दोन कार्यालयाच्या माध्यमातून सोडले जाते. त्यामुळे दोन कालव्यातील पाण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या कार्यालयाकडे जावे याबाबत टाळाटाळ केली जात होती. हंगाम संपूनही शेतकऱ्यांचे कालव्या संदर्भात कामे होत नव्हते. त्यामध्ये आता या दोन्ही कालव्या संदर्भात एकच कार्यालय वरोरा येथे निश्चित करण्यात आले असून अधिकाऱ्यांची नेमणूकही तातडीने करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांना आपली कामे करणे सुकर होतील. यासोबतच जलव्यवस्थापन कार्यशाळा व पाणी वाया समित्यांचे नव्याने गठण करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)