शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

कालव्याचे पाणी नको, शेती परत करा

By admin | Updated: November 6, 2014 22:52 IST

कालव्याकरीता शेती देण्यात आली. त्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानही मिळाले नसताना कालवे तयार झाले. परंतु अनेक गावात २० वर्षांपासून पाणी पोहचले नाही. त्यामुळे आमच्या शेत जमीनी

ठिय्या आंदोलन : शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांसमोर आक्रोशवरोरा : कालव्याकरीता शेती देण्यात आली. त्यातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानही मिळाले नसताना कालवे तयार झाले. परंतु अनेक गावात २० वर्षांपासून पाणी पोहचले नाही. त्यामुळे आमच्या शेत जमीनी आम्हाला परत करा, कालव्याचे पाणीही नको म्हणत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासमोर चांगलाच आक्रोश केल्याने वातावरण धिरगंभीर झाले. लाल पोथरा कालव्यातील पाणी वरोरा तालुक्याच्या २७ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरीता मिळत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, मागील २० वर्षांपासून शेवटच्या टोकावरील गावापर्यंत आजही पाणी पोहचलेले नाही. यावर्षी रब्बी पिकांना पाणी सोडण्यात यावे, याकरीता लाल पोथरा कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी पाटबंंधारे विभागाच्या वरोरा कार्यालयासमोर मागील पाच दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेण्याकरीता पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शेख व कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी ५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी कालव्याचा काम किती निकृष्ठ दर्जाचे आहे. शेवटच्या टोकापर्यंत आजही पाणी पोहचले नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत नाही. पाणी वाटप समित्या कागदोपत्री तयार करण्यात आल्या अशा एक ना अनेक तक्रारीचा पाण वाचत शेतकऱ्यांनी संतप्त भावना अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. त्यामुळे तक्रारीचा पाढा ऐकून पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी चांगलेच अवाक झाले होते. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश देत येत्या काही दिवसात अंमलबजावणी करुन अहवाल देण्याचे निर्देशही दिले. त्यानंतर पाणी वाटप संदर्भात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.राज्यात रब्बी हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाल्याचे शासनाने घोषीत केले आहे. मात्र, १५ नोव्हेंबर पूर्वी कालव्यातून पाणी सोडता येत नाही, अशी अडचण अधिकाऱ्यांनी मांडताच अधीक्षक अभियंता शेख यांनी शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याकरीता वरोरा परिसराच्या कालव्यातील पाणी १५ नोव्हेंबरपासून सोडणार असल्याचे जाहिर केले.लाल व पोथरा या वर्धा जिल्ह्यातील धरणामधून पाणी वाटप दोन कार्यालयाच्या माध्यमातून सोडले जाते. त्यामुळे दोन कालव्यातील पाण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या कार्यालयाकडे जावे याबाबत टाळाटाळ केली जात होती. हंगाम संपूनही शेतकऱ्यांचे कालव्या संदर्भात कामे होत नव्हते. त्यामध्ये आता या दोन्ही कालव्या संदर्भात एकच कार्यालय वरोरा येथे निश्चित करण्यात आले असून अधिकाऱ्यांची नेमणूकही तातडीने करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांना आपली कामे करणे सुकर होतील. यासोबतच जलव्यवस्थापन कार्यशाळा व पाणी वाया समित्यांचे नव्याने गठण करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)