शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:40 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे निर्देश : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार विभागाचा आढावा

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये. याबाबत राज्यस्तरावर एसएलबीसीच्या बैठकीमध्ये बँकांनी व्याज वसूल करु नये, असा निर्णय झालेला असून या निर्णयाचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शनिवारी सहकार विभागाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, सहकार विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. पोटे, सहकार क्षेत्रातील संबंधित विविध अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात असलेल्या पगारदार व नागरी सहकारी पतसंस्थांनी त्यांना मिळणाऱ्या नफ्यातील २० टक्के रक्कमेची गुंतवणूक करुन जिल्ह्यात सहकारी तत्वावर रुग्णालय उभारून गरीब व दूर्बल घटकातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहनही सहकार मंत्री देशमुख यांनी केले. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सोसायट्या सक्षमीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होईल, असे ते म्हणाले. अटल पणन महाअभियानांतर्गत ज्या विकास संस्थांची व्यवसायासाठी निवड करण्यात आली आहे. त्या संस्था योग्यरित्या कार्यान्वित होण्याकरीता सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत ना. देशमुख यांनी कर्जमाफी, बाजार समिती, सहकारी संस्था यासह विविध विषयाचा आढावा घेतला.जिल्ह्यात ९१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभचंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक मिळून थकीत कर्ज असणारे शेतकरी, प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणारे लाभार्थी व एकरकमी योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेले शेतकरी असे एकूण ९१ हजार १५७ कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांना ३५१ कोटी २२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली.