शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेसात क्विंटल हरभरा खरेदीची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:34 IST

राज्य शासनाने जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेसात क्विंटल हरभरा विकण्याची अट सोमवारपासून लागू केली. नाफेडतर्फे खरेदी करण्यासाठी केंद्रांची उभारणीही झाली. परंतु यंदाचे हेक्टरी लागवडी क्षेत्र व उत्पादन लक्षात घेता उर्वरित हरभरा कुठे विकायचा, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : उर्वरित हरभऱ्याचे करायचे काय?

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राज्य शासनाने जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेसात क्विंटल हरभरा विकण्याची अट सोमवारपासून लागू केली. नाफेडतर्फे खरेदी करण्यासाठी केंद्रांची उभारणीही झाली. परंतु यंदाचे हेक्टरी लागवडी क्षेत्र व उत्पादन लक्षात घेता उर्वरित हरभरा कुठे विकायचा, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे राजुरा येथी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची नाफेडतर्फे खरेदी केल्या जात आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यातही खरेदी केंद्र सुरू झाले. २०१८-१९ या वर्षात शासनाने हरभऱ्याला ४ हजार ६२० रूपये हमीभाव जाहीर केला आहे. हरभरा खरेदीसाठी निश्चित केलेली जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता वेगवेगळी आहे. त्यामध्ये जिल्ह्यासाठी हेक्टरी ७५० हरभरा विक्री करण्याची अट शासनाने घालून दिली आहे. यावर्षी हरभऱ्याच्या उत्पादनात बºयापैकी वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांनी २ हेक्टरमध्ये ४० पोते हरभरा पिकविला आहे. परंतु, हरभरा खरेदीसाठी शासनाने लावलेली अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. हेक्टरी उत्पादनाचा विचार केल्यास केवळ १५ पोते हरभरा नाफेडकडे विकता येणार आहे. यामुळे उरलेला हरभरा व्यापाऱ्यांच्या घशात घालायचा काय, असा संतप्त प्रश्न उपस्थित करीत आहेत.खासगी बाजारपेठेत तूर व हरभऱ्याचे दर आधीच कमी आहेत. परिणामी, यंदा शेतकºयांनी नाफेडला शेतमाल विकण्याचा निर्धार केला होता. याकरिता शेतकऱ्यांनी बँक पासबूक, आधारकार्ड, सातबारा व पीक पेरा पत्र आदी दस्तऐवज घेऊन आॅनलाईन नोंदणी केली. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून किंवा भ्रमणध्वनीद्वारे बोलविले जाते. परंतु, काही शेतकऱ्यांपर्यंत हा संदेशच पोहचत नाही. त्यामुळे हरभºयाची विक्री कशी करावी, हा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. हरभरा विक्रीची आॅनलाईन नोंदणी २८ माचपर्यत करता येईल, अशी माहिती नाफेडने दिली. बहुतांश शेतकऱ्यांनी तूर व हरभऱ्याची विक्री केली नाही. शासनाच्या जाचक अटीत हरभरा व तूर विक्री अडल्याने किमान आॅनलाईन नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.गडचांदूर येथे आॅनलाईन नोंदणी केंद्रराजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा पिकांची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी २५ किमी अंतरावर असलेल्या गडचांदूर शहरात जानेवारी लागते. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.माझ्या २ हेक्टर शेतात सुमारे ४० पोते हरभºयाचे उत्पादन झाले आहे. शासनाच्या नियमानुसार नाफेडकडे फक्त हेक्टरी ७ पोते हरभरा विकता येते. त्यामुळे उरलेला हरभरा कुठे विकायचा, हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला आहे.- भास्कर जुनघरी,शेतकरी, गोवरी