शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

चार लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 10:57 PM

जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गुरूवारपासून जिल्ह्यात जंतनाशक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे.या मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस.मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदींची उपस्थिती होती. यावेळी इतर आरोग्य विषयक योजनांचाही आढावा घेण्यात आला.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १९ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असुन त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतापासुन धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव आहे. कृमीदोषांचा संसर्ग दुषित वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे तसेच बालकांची बौध्दिक व शारीरीक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. भारतात ५ वर्षांखालील मुला - मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळून आले आहे. महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी एन. एफ. एच. एस ४ च्या सर्व्हेनुसार ३४.४ टक्के आहे. तसेच एन.एफ.एच.एस ३ च्या सर्व्हेनुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९ टक्के आढळले आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम राबविण्यात येत आहे.१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा मुख्य उद्देश आहे. सदर मोहिम सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका क्षेत्र वगळूण व सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कुल, सी. बी. एस. सी. स्कुल, नवोदय, सुधार गृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कुल, गुरुकूल संस्कार केंद्रे, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षांचे विद्यार्थी, नर्सिग कॉलेज, आय.टी.आय., पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला वाणिज्य व विज्ञान, फार्मसी, महाविद्यालय, डी.एड् महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. या मोहीमेला नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.